शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने आखला 'ॲक्शन प्लॅन'

By appasaheb.patil | Updated: September 23, 2022 17:47 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर - बालविवाह निर्मुलन हा बाल मृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्राथमिक शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मुलन प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा (TOT) आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सीईओ स्वामी बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, सुधा साळुंखे, निशित कुमार संस्थापक अध्यक्ष SBC 3,पूजा यादव कार्यक्रम प्रमुख,विकास कांबळ, जिल्हा समन्वयक (सोलापूर व लातूर),नंदू जाधव (जिल्हा समन्वयक धुळे व जलगाव),जिल्हा महिला व बाल विकास विभाग UNICEF, SBC 3, व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.बालमृत्यू आणि मातामृत्यू ही मोठी समस्या असून या समस्येचे प्रमुख कारण बालविवाह असल्याचे सांगून सीईओ स्वामी म्हणाले, बालवयात लग्न झालेल्या मुलींचे गर्भाशय विकसित झालेले नसल्याने तीच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सोलापूर जिल्हा परिषदेने या अगोदरच जिवनाची हमी बालमृत्यू कमी हे अभियान सुरू केले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचे चांगले काम सुरू आहे. तसेच नुकतेच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान जाहीर केले आहे. 

कोविड काळातही सोलापूर जिल्हा परिषदेने *माझे मुल माझी जबाबदारी* या उपक्रमाची अंमलबजावणी करुन कित्येक दुर्धर आजाराने ग्रस्त मुलांचा शोध घेतला व योग्य वेळी त्यांच्यावर उपचार करून त्या बालकांना जिवदान दिले आहे.

या सर्व अभियानाच्या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मुलन प्रशिक्षण युनिसेफ व प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केले त्यामुळे या दोन्ही अभियानास पुरक असा हा उपक्रम असून युनिसेफ आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे मी अभिनंदन करत असल्याचे सांगितले. प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षक जिल्हाभरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करतील व सोलापूर जिल्ह्यात लवकरच बालविवाह निर्मुलन होईल. यावेळी सर्वांना बालविवाह निर्मुलनाची शपथ देण्यात आली.

या प्रशिक्षणात परिचय, प्रशिक्षण प्रवाह,  महाराष्ट्रातील बाल विवाहाची स्थिती किती, कुठे व परिणाम, बाल विवाहाच्या विविध स्तरावर काय करायचे ? सक्षम नियोजन, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम व बाल न्याय अधिनियम यांची सांगड, बालविवाहाची नोंदणी, बाल विवाह पूर्व, बाल विवाह घडत असताना, बाल विवाह झाल्यानंतर माहिती, सक्षम - बाल विवाह निर्मूलन प्रशिक्षण अहवाल आदी मुद्दयांवर चर्चा करणेत आली. 

 “सायकली” मुळे तीन हजार मुली

शाळेकडे वळल्या - सीईओ स्वामी ………………सोलापूर जिल्हा परिषदेचा *सायकल बॅंक* उपक्रमही बालविवाह निर्मुलनामध्ये उपयोगी ठरत आहे. केवळ सायकल नसल्यामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत चालले होते. मुलींनी शाळा सोडल्यानंतर त्यामधील काहींचे बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समजली. हे थांबविण्यासाठी लोकसहभागातून मुलींसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सायकल बॅंक स्थापन करण्यात आली. आजपर्यंत सुमारे तीन हजार सायकली लोकसहभागातून जमा झाल्या असून तीन हजार मुली शिक्षणाकडे पुन्हा वळल्या असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पुढे यावे असे आवाहन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद