शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
2
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
3
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
4
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
5
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
6
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
7
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
8
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...
9
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
10
Apple देशातील 'या' शहरांमध्ये सुरू करणार नवे स्टोअर्स, महाराष्ट्रातील दोन शहरांची निवड
11
लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा
12
"आज ५ लोक मरणार"; अमेठी हत्याकांडातील आरोपी चंदन वर्माने WhatsApp वर ठेवलेलं स्टेटस
13
३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
14
"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
15
मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास
16
Diffusion Engineers Share Price : पहिल्याच दिवशी ₹२०० पार पोहोचला 'हा' शेअर; बाजारात एन्ट्री घेताच अपर सर्किट; ११४ पट झालेला सबस्क्राइब
17
४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."
18
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
19
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
20
Rakhi Sawant : Video - "स्मशानभूमीतून आईच्या अस्थी..."; ढसाढसा रडत राखीने मोदींकडे मागितली मदत

पथकानं बांधावर येऊन केली पाहणी.. तीन महिने विलंबानं बळीराजा नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:19 AM

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, ...

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, वीज वितरण आदी शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यशपाल व मुख्य अभियंता (एन.एफ.एस.जी) तुषार व्यास यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार विवेक साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, जिल्हा उपनिंबधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यांच्या बांधावर जाऊन पाहणी अन्‌ संवाद साधला

केंद्रीय पथकाने अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधांवर जाउन पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. भंडीशेगाव येथील शेतकरी विठ्ठल यलमार यांनी पीक नुकसानीची माहिती दिली, तर मोहन आप्पा कवडे यांनी घरात पाणी आल्याने झालेली पडझड व पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे याबाबत माहिती दिली तसेच सुनील सुरवसे यांनी पुरामुळे शेतजमिनीसह डाळिंब पीक वाहून गेल्याचे सांगितले. उपरी येथील शेतकरी शहाजी गव्हाणे यांच्या उसाच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी उपरी ग्रामस्थांनी पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी केली, तर टाकळीच्या महादेव काशीद व लालासो देशमुख यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली.

तालुक्यात ६९ हजार शेतकऱ्यांचे ६५ जार हेक्टरचे नुकसान

यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी तालुक्यातील अतिवष्टीमुळे व पुरामुळे ६९,५०० शेतकऱ्यांचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, मका बाजरी, भुईमूग, ज्वारी, कांदा, सोयाबीन, फळबाग, घरांची पडझड, आदींचा समावेश आहे. तसेच रस्ते, पूल, वीज, बंधारे या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे यावेळी केंद्रीय पथकाला सांगितले.

पथक उशिरा आल्याने शेतकरी संतप्त

तीन महिन्यांपूर्वी पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी, महापुरामुळे शेती, फळबागा, पिके, जनावरे, घरे, रस्ते, वीज, पुलाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने पंचनामे करून मदत मिळणे गरजेच होत. मात्र केंद्राचे पथकच तब्बल तीन महिन्यांनी नुकसानीची पहाणी करण्यासाठी येत असेल तर नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडला.

-----

फोटो ओळी -

उपरी व भंडी शेगाव परिसरांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.

===Photopath===

221220\22sol_6_22122020_4.jpg

===Caption===

उपरी व भंडी शेगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.