शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

चांदणी नदीवर पुलाला भगदाड, बार्शी-भूम वाहतूक झाली ठप्प

By काशिनाथ वाघमारे | Published: June 24, 2024 6:57 PM

पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.  

सोलापूर  : बार्शी तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून आगळगावची ओळख आहे. या गावची लोकसंख्या सुमारे १० हजारांच्या आसपास असून, या गावातून बार्शी-भूम-आगळगाव हा रस्ता तालुक्यास जोडणारा मार्ग आहे. या गावाजवळून जाणाऱ्या चांदणी नदीवरील पुलास मोठे भगदाड पडले असून बार्शी-भूम वाहतूक ठप्प झाली आहे.

 आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असल्याने व आगळगाव बाजाराचे केंद्रबिंदू आहे. याच गावातून चांदणी नदी वाहते याच नदीवरील पुलाला गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठे भगदाड पडले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. चांदणी नदीचा उगम धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथून झाला असून, या नदीला पावसाळ्यात भरपूर पाणी येते. त्यातच पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा तासन् तास वाहतूक खोळंबली जाते. चांदणी नदीवरील पुलाला सुमारे २५ ते ३० वर्षे झाले असून, पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्यातच पुलाला भगदाड पडले आहे.

याच पुलावरून अनेक शाळांचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. तसेच याच मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासह १० गावची वाहतूक या रस्त्यावरुन सतत वाहतूक होते.  

चांदणी नदीच्या पुलावरील भगदाड लवकरात लवकर बुजवावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करु. -पोपट डमरे, माजी सदस्य, जिल्हा परिषद 

टॅग्स :Rainपाऊस