शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत

By दिपक दुपारगुडे | Published: April 12, 2023 5:26 PM

सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे.

सोलापूर : सध्याच्या डिजिटल युगात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी स्थानांतरण काही सेकंदात होते; परंतु या काळातही टपाल खात्याच्या पारंपरिक ‘टपाल पेट्या’चे महत्त्व मात्र अद्याप कायम आहे. सध्याचे संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली असून आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल व मॅसेजने घेतली आहे. सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे.

पूर्वी लहानपणी नातेवाइकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आनंद वार्ता असे सगळे काही चालायचे ते टपालपेटीमार्फत... जवानांपासून ते कंदिलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली एखादी म्हातारी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा. परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपालपेटीचे काम कमी झाले असले तरी ते आपले अस्तित्व टिकवून आहेत.म्हणून आहेत कार्यरत

सध्या पोस्टामधून शासनाने 'संजय गांधी', 'श्रावणबाळ' अशा विविध योजना निराधारांना सुरू करून त्यांचा दर महिन्याचा पगार हा पोस्टामधूनच केला जातो. सरकारी कार्यालयांचा व्यवहार, बँका, खासगी संस्थांचा पत्रव्यवहार, कोर्टाचा पत्रव्यवहार पोस्टाच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे पोस्टाच्या पेट्या कार्यरत आहेत.काय म्हणतात टपाल अधिकारी

अनेकांना टपाल पेट्यांचा पर्याय कालबाह्य वाटत असला तरी त्याची उपयोगिता मात्र संपली नाही. कारण आजही दुर्गम भागात पत्र पोहोचवणारा पोस्टमन सरकारी योजनांचा लाभही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूर