शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

उजनी धरणाची पाणीपातळी खालावली; धरणात उरलं फक्त उणे ३५ टक्के पाणीसाठा

By appasaheb.patil | Updated: March 26, 2024 13:42 IST

सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: यंदा उन्हाळ्यात सोलापूरला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे. सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा हाेत आहे. सध्या उजनी धरणात मायनस ३५.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक उरला आहे. मागील उजनी धरणातील पाणीपातळी याच काळात ४०. ७४ टक्के एवढी होती. 

दरम्यान, सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणातील पाणीसाठा काही टक्केच शिल्लक राहिला आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा सध्या भरला आहे, हिप्परगा तलावात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय एकरूख प्रकल्पात २३.२८ टक्के, हिंगणी प्रकल्पात मायनस ९.९१ टक्के, जवळगांव ०.७६ टक्के, मांगी ०.०० टक्के, आष्टी ११.८३ टक्के, बोरी मायनस १.७७ टक्के तर पिंपळगांवढाळे प्रकल्पात मायनस २.८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे चटके बसत असून २१ गावात टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा हाेत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDamधरण