शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

उजनीतून सोडलेले पाणी शेतकरी हितासाठी की वीजबिल वसुलीसाठी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:26 AM

पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान ...

पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिके धोक्यात येऊ लागली आहेत. अशातच उजनी धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरू लागली होती. याचा शासनस्तरावर विचार करून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आणि कालव्याला पाणी सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु वीजबिल भरा, अन्यथा रोहित्रच बंद करण्याचा पराक्रम वीज वितरणने सुरू केला आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतीसाठी का वीजबिल वसुलीसाठी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार

रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु शेतमालासह भाजीपाला कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असे असताना रोहित्रामध्ये केवळ तेल टाकावे लागले तरीही बिल भरण्याचा अट्टाहास वीज वितरणकडून केला जातो. त्यामुळे रोहित्रामध्ये किरकोळ बिघाडापासून ते जळलेला भरण्यापासूनचा खर्च अनेकवेळा शेतकरी पदरमोड करून करणे सोयीचे समजतात. तरीही वीजबिलाच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जातोय, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

कोट ::::::::::::::

वीजबिल भरल्याशिवाय महावितरण चालणार नाही. परंतु सध्या शेतकरीही आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

- बबनराव शिंदे

आमदार, माढा

कोट ::::::::::::::::::

भाजप सरकारच्या काळात कधीही शेतकऱ्यांची वीज खंडित केली नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने मदत करणे गरजेचे असताना वीजबिलासाठी वीज खंडित करण्याचा चालू असलेला प्रकार चुकीचा आहे, हे त्वरित बंद करावे.

- समाधान आवताडे

आमदार, पंढरपूर-मंगळवेढा