शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल... ओक्के मदी सगळं; शहाजीबापूंच्या ‘डोंगार’मुळे माणदेशी बोली जगभर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 08:33 IST

शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं.

रवींद्र देशमुख -

सोलापूर: अहो, चर्चा तर होणारच! सांगोल्याच्या शहाजीबापूंनी जणू गुवाहाटीचं ‘डोंगार’च सर केलंय... माणदेशसारख्या कोरड्या भागातून आलेेल्या या शिवसेनेच्या रांगड्या आमदारानं आपल्या माणबोलीतून आसामची हिरवाई जगभर पोहोचवली... यानिमित्ताने ‘गदिमा’, व्यंकटेश माडगूळकर या दिग्गज लेखकांनी अक्षरवैभव दिलेल्या माणदेशी भाषेची चर्चा सुरू झाली. नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातील आर्ची ठसक्यात म्हणाली होती ना..‘मराठीत कळत नाय, तर इंग्लिशमध्ये सांगू का?’ ही करमाळा भागातील भाषा देशभर पोहोचली; पण शहाजीबापूंनी तर माणबोली जगभर पोहोचवली.शहाजीबापू अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले. दोन-तीन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन केला अन् माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं. त्यांच्या त्या संवादाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे जसा माणदेशी रांगडेपणा उमजला तसं बंडामागचं खरं खरं कारणही मराठी जनतेला उमजलं. जशी ही ऑडिओ क्लिप जगभर गेली, तसे शहाजीबापूही गाजले.सोशल मीडियावर जिकडे पाहावे तिकडे ‘काय झाडं, काय डोंगार...‘ओके’मध्ये आहे’ हे त्यांच्या संवादाचं पहिलं वाक्य अनेकांच्या वॉलवर झळकू लागलं. अनेक यू-ट्यूबर पत्रकारांनी बापूंच्या या ऑडिओमधील कन्टेन्टचा आधार घेऊन सध्याच्या राजकारणाचं विश्लेषण करणारे व्हिडिओ केेले. हजारोंच्या संख्येने लाईक्स अन् व्ह्यूज या व्हिडिओंना मिळत आहेत.शहाजीबापू ज्या भागातून आलेत तो माणदेश हा सातारा, सांगली अन् सोलापूर जिल्ह्यातील माण नदीच्या खोऱ्याचा प्रदेश. पाण्याअभावी आलेला कोरडेपणा येथील माणसांच्या स्वभावात व भाषेवरही दिसून येतो. माणदेशी बोली जितकी रांगडी तितकीच आपुलकीची अन् प्रांजळ... 

तिथली रम्यता भावली असेल!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा इंगोले यांनी शहाजीबापू पाटील यांच्या संवादातील भाषा अन् भाव याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विवेचन केले. ते म्हणाले की, आमदारांचं अवघं आयुष्य माणदेशातील कोरड्या प्रदेशात गेलं. त्यांना तिथले डोंगर, झाडे आणि एकूणच रम्यता भावली. त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यातून आले. इथल्या भूप्रदेशाचा, वातावरणाचा परिणामही माणसाच्या वागण्या-बोलण्यात आलेला आहे. त्यामुळे भाषेचा लहेजा वेगळा वाटतो. माणदेशी बोलीभाषा इथल्या ग्रामीण महिलांमध्ये अधिक जाणवते. ‘वरलीकडून आला’, ‘खाललीकडं गेला’ अशी बोली सर्रास ऐकायला मिळते. माणदेशी बोलीवर सध्या संशोधन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाषेचा गौरव झाला!सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे शहाजीबापूंच्या बोलीची प्रशंसा केली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मुळे करमाळा, जेऊरची भाषा देशभर पोहोचली. बापूंच्या मोबाईलवरील संवादामुळे बऱ्याच काळानंतर आमच्या भाषेला उजळणी मिळाली..या निमित्ताने सोलापुरी भाषेला गौरव प्राप्त झाला आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेhotelहॉटेल