शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोलापूरचे दोन मंत्री काय कामाचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:13 IST

आमदार प्रणिती शिंदेचा अधिवेशनात सवाल; सोलापूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा ?

ठळक मुद्देसोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात व उजनी धरणाच्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी तातडीच्या बैठकीची घोषणा उजनीतून पाणी सोडल्यानंतर ते मध्येच अनेक भागात उचलले जाते आणि ही गोष्ट वर्षानुवर्षे सुरूयंदा दुष्काळाची स्थिती अनेक भागात गंभीर आहे आणि मराठवाड्यातील धरणात तर अर्धा टक्काही पाणी नाहीे

सोलापूर : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात सोलापूरच्या आठ दिवसाआड अनियमित पाणी पुरवठ्याच्या प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.  शिंदे यांनी सोलापूरचे दोन मंत्री काय कामाचे, असा सवाल केला. आगामी काळात सोलापूर शहर पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासाठी व आषाढी वारीसाठी पाण्याचे काय नियोजन आहे, याबाबत जलसंपदा मंत्री यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये उजनी धरण १०० टक्के भरलेले असताना सुद्धा गेल्या ८ ते ९ महिन्यांमध्ये सोलापूर शहराला ६ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ सोलापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या उजनी धरण हे वजा ५९ टक्के झाले असून सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात दुष्काळ असताना उजनी धरण वजा ५० टक्के असताना सुद्धा सोलापूर शहरात २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु सध्या सरकारच्या दोन मंत्र्यांमुळे व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करण्याचे कोणतेच नियोजन दिसून येत नाही. यामुळे शासन कोणती उपाययोजना करणार, असा सवाल आ़ शिंदे यांनी केला. 

प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे डॉ.मिलिंद माने यांनी विचारलेल्या प्रश्नात राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले.   राज्याच्या विविध भागात पाणीप्रश्नाने उग्र रूप धारण केलं असून लोकांना शंभर दीडशे किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे आणि ही वेळ लोकांवर आली ती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे, अशी टीका पवार यांनी केली. प्रणिती शिंदेंसह भारत भालके, राजेश टोपे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. 

शेवटी गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले, की  उजनीतून पाणी सोडल्यानंतर ते मध्येच अनेक भागात उचलले जाते आणि ही गोष्ट वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा दुष्काळाची स्थिती अनेक भागात गंभीर आहे आणि मराठवाड्यातील धरणात तर अर्धा टक्काही पाणी नाहीे. मात्र, विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने अखेर उपाध्यक्ष विजय औटी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. 

आज मंत्रालयात होणार तातडीची बैठक- आ़ प्रणिती शिंदे यांनी पाणीप्रश्नावरून केलेल्या आरोपामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात व उजनी धरणाच्या पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी तातडीच्या बैठकीची घोषणा केली़ ही बैठक शुक्रवारी (२१ जून २०१९) होणार आहे़ या बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पाणीपुरवठा अधिकारी गंगाधर दुलंगे यांच्यासह अन्य अधिकाºयांची टीम उपस्थित असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरणMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन