शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

निवडणुका आल्या की पळापळ.. पश्चात्ताप झाला की घरी; मोहिते-पाटलांच्या पक्षांतरावर शिंदेंचे सूचक वक्तव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 14:32 IST

काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात आगमन झाले.

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात आगमन झाले.लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर महाराज येऊ दे, नाहीतर आणखी कोणी पॉवरफुल्ल. लोकसभेचे निवडणूक रणांगण मला नवीन नाही - सुशीलकुमार शिंदे

राजकुमार सारोळे 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर महाराज येऊ दे, नाहीतर आणखी कोणी पॉवरफुल्ल. लोकसभेचे निवडणूक रणांगण मला नवीन नाही. युद्धभूमीत कोण येतो, कोण जातो, सामना तर करायला लागतोच, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी ‘जनवात्सल्य’ या त्यांच्या निवासस्थानी शिंदे यांच्याशी संवाद साधला. भाजपतर्फे विरोधात नवा चेहरा आणला जात आहे, यावर प्रतिक्रिया विचारल्यावर शिंदे म्हणाले की, निवडणूक ही एकप्रकारची युद्धभूमीच आहे. त्यात समोर कोण येतो याचा विचार न करता सामना करायची तयारी लागतेच.

गेल्या निवडणुकीसारखा मी आता गाफील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील जाहीर सभेत यंत्रमागाचे उदाहरण दिले होते. टेक्स्टाईल इंडस्ट्री इतकी मोठी असताना शिंदे यांनी काय केले अशी टीका त्यांनी केली होती. हम करेंगे असे आश्वासन देऊन साडेचार वर्षांत एक मीटर कापड खरेदी केलेले नाही. मोदींची आश्वासने फेल गेली आहेत.

प्रकाश आंबेडकरांच्या धोरणात बसते का?च्बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती, त्याचा परिणाम होईल का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, कोणी कुठे लढावे हा त्यांचा प्रश्न आहे. बहुजन वंचित आघाडीची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या चर्चेच्या एका बैठकीला मीही उपस्थित होतो. पण त्यांच्या मागण्या मोठ्या होत्या. पक्षाला बाजूला सारून या मागण्या पूर्ण करणे अशक्य होते. पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची भारतीय राज्यघटना लिहिली, घटनेचा ढाचा निधर्मी आहे, असे असताना बहुजन वंचित आघाडीने जातीयवादी शक्तीबरोबर आघाडी केली आहे, हे प्रकाश आंबेडकर यांच्या सूत्रात बसते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आडम पूर्वीची मदत विसरले का?- माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केंद्रात माकपची काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी सोलापुरात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदे यांनी सोडल्याशिवाय मी मदत करणार नाही, असे वक्तव्य केल्याचे निदर्शनाला आणल्यावर शिंदे म्हणाले की, या विषयावर आडम माझ्याशी बोललेले नाहीत. यापूर्वी मी त्यांना मदत केली आहे. मोठा आग्रह करून प्रकाश यलगुलवार यांची उमेदवारी काढून त्यांना निवडून आणल्याचे विसरले आहेत.

राजकारणात होतं असं कधी कधी- माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माघार का घेतली, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, निश्चित कारण मला नाही सांगता येणार. पण राजकारणात असं होतं कधी कधी. प्रत्येकाच्या सोयीचा प्रश्न असतो. त्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावे लागतात. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडझडीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, मी इतकी वर्षे पाहत आलो आहे. निवडणुका आल्या की पळापळ होते अन् नंतर पश्चात्ताप झाला की आपोआप घरी येतात. त्याचं इतकं टेन्शन घेण्याचे कारण नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस