शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

धार्मिक तेढ वाढविण्यासाठी शहराचे नाव बदलण्याचा घाट, अबू आझमींचा आरोप

By शीतलकुमार कांबळे | Published: July 23, 2022 3:58 PM

Abu Azmi : उस्मानअली यांनी देशासाठी सहा टन सोने दिले, अशा व्यक्तींचे नाव का बदलले, असा सवाल करत धार्मिक तेढ वाढविण्यासाठीच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सोलापूर : देशात काही शहरांचे नाव बदलण्याचे काम सध्या सुरु आहे. महाराष्ट्रातही हा प्रकार होत आहे. मीर उस्मानअली यांच्यावरुन उस्मानाबाद हे नाव  पडले. उस्मानअली यांनी देशासाठी सहा टन सोने दिले, अशा व्यक्तींचे नाव का बदलले, असा सवाल करत धार्मिक तेढ वाढविण्यासाठीच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे शनिवारी सोलापुरात होते. सोलापुरातून उस्मानाबाद येथे जाण्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशात जे हिंदू-मुस्लीम दरी वाढत आहे. ही दरी कमी करायचे असेल तर बंधुत्व वाढायला हवे. हाच बंधुत्वाचा विचार घेऊन मी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अबू आझमी म्हणाले, भाजपला रोखण्यासाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. पण, त्यांनी बाबरी मशीद आम्ही पाडली असे म्हणत आमच्या जुन्या जखमा उकरुन काढल्या. याची आम्हाला खंत वाटते. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात मौलाना आर्थिक महामंडळ, हज कमिची, उर्दू घरासाठी त्यांनी काही काम केले नाही.

स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी उर्दू ठरली. ही भाषा या देशातील असताना आज उर्दूला परदेशी ठरवत आहेत. मुस्लीम युवकांना बेकायदेशीरपणे जेलमध्ये टाकले आहे. जे निर्दोष असतील त्यांना सोडायला हवे, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली.

'...तर देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल'केंद्र सरकार हे देश विकण्याचे काम करत आहे. खासगीकरण करुन आरक्षण काढून घेत आहे. रेल्वे, विमान या सेवा काही मोजक्याच खासगी व्यावसायिकांच्या घशात घालण्यात येत आहे. आता देशावर 136 लाख कोटी कर्ज आहे. मगाहाई वाढत चालली आहे, असेच राहीले तर देश श्रीलंका सारखे बनेल, असे अबू आझमी म्हणाले.

'...मग हिजाबला विरोध का?'याचबरोबर, अभिनेता रणवीर सिंगच्या नुकत्याच करण्यात आलेल्या फोटोशूटचा उल्लेख अबू आझमी यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यूड फोटोशूट खपवून घेतला जात असेल तर मग आपल्या मर्जीने परिधान केलेल्या हिजाबला विरोध का? असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीSolapurसोलापूर