शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परिस्थितीचं भांडवल न करता शेती अन् पेन्शनवर मुलांना उभं केलं पायावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:07 IST

वीरपत्नीची संघर्ष गाथा; वीरपत्नी निर्मलाबार्इंचं धाडस; शहीद बजरंग मुंढे मळेगावकरांना प्रेरणा 

ठळक मुद्देमळेगावमधील माजी सैनिक नागनाथ विटकर, बाळासाहेब माळी यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीमधून गावामध्ये शहीद स्मारक उभारले स्वाभिमानी स्वभावाने परिस्थितीचे भांडवल करुन कधी कुणाकडे मदत मागितली नाहीछोटा मुलगा प्रमोद हा एस.आर.पी. मधील सेवेनंतर उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये हवालदार या पदावर दाखल

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : मळेगाव येथील बजरंग श्रीपती मुंढे नागालँड सीमेवर इंटेलिजन्स कोअर (नायक) म्हणून सेवा बजावत असताना शहीद झाले. लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडील शहीद होताना एक मुलगा दोन वर्षांचा आणि दुसरा महिन्यांचा होता. या परिस्थितीमधून सावरण्यासाठी काही वर्षे लोटली. सासू-सासºयांनी आधार दिला. खचून न जाता मुलांना शिकवल़े  आज दोन्ही मुले स्वत:च्या पायावर उभारली अन् पतीचे स्वप्न पूर्ण झाल्याची कृतार्थ भावना वीरपत्नी निर्मलाबाई मुंढे यांनी व्यक्त केली. 

ही संघर्षगाथा आहे बार्शी तालुक्यातील मळेगाच्या निर्मलाबाई मुंंढे यांची़ नारायण मुंढे, जरीचंद मुंढे, बजरंग मुंढे या तीन भावंडाचे एकत्र कुटुंब होते़ शहीद बजरंग हे सर्वात लहान. वडील श्रीपती मुंढे हे वारकरी संप्रदायातील व्यक्ती. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. वयाच्या १९ व्या वर्षी बजरंग सैन्यात भरती झाले. सैन्यामध्ये आठ वर्षे सेवा बजावल्यानंतर बजरंग यांचे निर्मलाबाई यांच्याशी विवाह झाला. धाडसी स्वभावामुळे बजरंग गुप्तहेर खात्यात (इंटेलिजन्स कोअर) सेवा बजावू लागले. शहीद होण्यापूर्वी एक महिना अगोदर ते मुलगा झाल्याच्या आनंदात त्याला पाहण्यासाठी आले़ त्यानंतर अचानकपणे एक दिवस ते शहीद झाल्याची तार आली. या घटनेदरम्यान मुलं छोटी असल्याने त्यांना फक्त फोटोतील पित्याचा चेहराच आठवतो. 

अत्यंत तुटपुंज्या पेन्शनवर मुलांना सांभाळताना कसरत करावी लागली. काही काळ शेतीमधील कामे करावी लागली़ ही परिस्थिती चुलत सासरे कारभारी मुंढे यांना समजताच मुलांचा शैक्षणिक खर्च उचलला़ लहानपणापासूनच मुलांमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार रुजवले़ कठीण परिस्थितीसमोर हार मानली नाही़ कठोर परिश्रमाचे मूल्य मुलांमध्ये रुजवले. स्वाभिमानी स्वभावाने परिस्थितीचे भांडवल करुन कधी कुणाकडे मदत मागितली नाही.

मळेगावमधील माजी सैनिक नागनाथ विटकर, बाळासाहेब माळी यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीमधून गावामध्ये शहीद स्मारक उभारले आहे. छोटा मुलगा प्रमोद हा एस.आर.पी. मधील सेवेनंतर उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये हवालदार या पदावर दाखल झाला. मोठा मुलगा प्रवीण हा गावातील नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात मराठी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

स्वाभिमानी निर्मलाबाई सासरीच स्थिरावल्या...

  • - दोन्ही मुलांचा सांभाळ करताना खूपच ओढाताण झाली़ त्यातच पतीचा पगारही थांबला़ पेन्शन अगदीच तुटपुंजी असल्याने एका वर्षातच एकत्र कुटुंबाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 
  • - एका दु:खातून सावरत असताना पुन्हा एक मानसिक धक्का बसला. त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिला माहेरी स्थायिक होण्याचा सल्ला दिला. पण स्वाभिमानी स्वभावाच्या निर्मलाबार्इंना तो सल्ला आवडला नाही. त्यांनी सासरी राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. 
  • - स्थिर स्थावरतेनंतरच दोन्ही मुलांची लग्नं लावली़  जन्मभूमी मळेगावची नाळ तुटू नये म्हणून प्रत्येक वर्षी उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण कुटुंब मळेगावी वास्तव्याला येते़ 
टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला