शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

जागतिक ग्राहक दिन विशेष - फसवणुक झालेल्या २७०६ ठेवीदारांनी ठोठावले न्यायालयाचे दरवाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:47 IST

जागतिक ग्राहक दिन विशेष, फसवणुकीत आर्थिक संस्था प्रथम तर विमा कंपन्या, वीज मंडळ दुसºया क्रमांकावर

ठळक मुद्दे१५ मार्च  ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून पाळला जातोय़ ग्राहक आणि फसवणूक हे दोन शब्द परवलीचे ठरले आहेत़ ‘जागो ग्राहक जागो’ म्हणण्याची वेळ आली आहे़ 

काशिनाथ वाघमारेसोलापूर : ग्राहक हिताचे कितीही कायदे केले तरी एखाद्या गोष्टीचा मोह त्याला अडचणीत आणतोच़ येथे त्याचा सुज्ञपणाही धुळीला लागतोय़ याचे उदाहरण जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडील आकडेवारीने दाखवून दिले आहे़ जादा व्याजदराच्या प्रकरणातून फसवणूक झालेल्या २७०६ ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचाचे दरवाजे ठोठावले आहेत़ विविध प्रकारच्या फसवणुकीत आर्थिक फसवणूक प्रथम क्रमांकावर तर त्याखालोखाल वैद्यकीय आणि विमा कंपन्यांचा क्रमांक लागतोय़ 

१५ मार्च  ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून पाळला जातोय़ ग्राहक आणि फसवणूक हे दोन शब्द परवलीचे ठरले आहेत़ या दोन शब्दांचेही नाते खूप जवळचे झाले आहेत़ म्हणूनच की काय गेल्या ३२ वर्षांत जादा व्याजदर किवां दामदुप्पट योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २७०६ ठेवीदारांची फसवणूक झाली आणि त्यांनी ग्राहक न्याय मंचात धाव घेतली आहे़ ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ अमलात आला आणि सोलापुरात त्याच काळात जिल्हा ग्राहक न्याय मंच स्थापन झाले़ आज या ग्राहक न्याय मंचावर त्रिसदस्यीय पीठाची व्यवस्था निर्माण झाली आहे़ पी़ एल़ जाधव हे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तर बी़ एम़ महंत (गाजरे) हे सदस्य म्हणून काम पाहत आहेत़ एक सदस्यपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे़ 

 दैनंदिन जीवन जगत असताना ग्राहकांच्या पुढ्यात हित आणि फसवणूक दोन्ही गोष्टी येतात़ नेमके अज्ञानापोटी दोन्हीपैकी एक अनुभव हाती पडतो़ पावलोपावली ग्राहकाने सज्ञानपणाने वागण्याची वेळ आली आहे़ विविध प्रकारे फसवणुकीचे प्रमाण वाढले असले तरी जिल्हा ग्राहक न्याय मंच न्याय मंचात विविध पातळ्यांवर लढा दिला जातोय़ न्याय पदरात पाडून घेत असताना मात्र वेळ आणि आर्थिक खर्चाचा फटकाही ग्राहकाला सोसावा लागतो आहे़ सजग राहण्याबाबत काही अनुभवही ग्राहक मांडत असतात़ ‘जागो ग्राहक जागो’ म्हणण्याची वेळ आली आहे़ 

सोलापूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे़ १९८६ पासून २७०६ ठेवीदारांची प्रकरणे ग्राहक न्याय मंचात दाखल झाली आहेत़ या प्रकरणात पोलिसांकडून पतसंस्था आणि बँकांच्या संचालकांना, अध्यक्षांना योग्यवेळी वॉरंट बजावणी होत नाही़ ही एक मोठी समस्या ठरली आहे़ परिणामत: न्यायाला विलंब लागतो आणि याबरोबरच पक्षकाराला आर्थिक आणि मानसिकही त्रास सोसावा लागतो़ परंतु भविष्यात ग्राहकाला जागरुकच रहावे लागणार आहे़ -अ‍ॅड़ सुनील बनसोडे

एखादे वीज बिल आले तरी आपण ते तपासून पाहत नाही़ त्यामध्ये इंधन अधिभार, इतर कर कशासाठी लावले गेलेत हे कोणीही ग्राहक जाणून घेत नाही़ अज्ञानापोटी, धाडस न करण्याने बहुतांशवेळा आर्थिक फटका सर्वसामान्य ग्राहक सहन करतोय़ आतातर काही कमी उत्पन्न गटातील हॉटेल, कॅ न्टीन जीएसटी उल्लेख करून बिले देण्याचे धाडस दाखवताहेत़ सुजाण ग्राहक म्हणून याची चौकशी करण्याचे आणि लुबाडणूक थांबवण्याचे धाडस दाखवले पाहिजे़- नेहा पुल्ला, ग्राहक 

 एकदा मोबाईलचे बिल नेहमीपेक्षा जास्तीचे आले आणि त्यांच्या कार्यालयात जाऊन डीटेल पाहिले़ शंभर रुपये जादाचे लागल्याचे निदर्शनास आणून दिले़ काही वस्तूंची एमआरपी आपण तपासून पाहत नाही, कालबाह्य झालेली नजरचुकीने विक्रीला येतात़ जर फसवणूक झालीच तर सर्वसामान्य ग्राहक म्हणून त्या व्यवस्थापनाला वस्तू परत मिळण्यास अथवा रक्कम परत मिळण्याबाबत पत्र देऊन १५ दिवसांची मुदत देता येत़े या काळात त्यांनी ऐकलेच नाही तर वकिलांशिवायही तक्र ार दाखल करून प्रकरण लढवता येते़ - अश्विनी ढंगापुरे, ग्राहक 

फसवणुकीचे प्रकार    दाखल प्रकरणे    निकाली प्रकरणे    प्रलंबित प्रकरणे 

  • १) पतसंस्था/बँका    २,७०६    २,४७०        २३६
  • २) विमा संरक्षण कंपन्या    २,३९१    २,२७३        ११८
  • ३) वीज मंडळ    १,१३८    १,०७०        ६८
  • ४) बांधकाम    ८२९    ६४२        १८७
  • ५) वैद्यकीय     ९७    ८५        १२
  • ६) रेल्वे     ५६    ५३        ०३
  • ७) इतर    ४,१९४    ४,०२९        १६५
  •     एकूण    ११,४१९    १०,६२९        ७९०
टॅग्स :SolapurसोलापूरConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तू