शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

4G की 5G? कोणता स्मार्टफोन घ्यायचा? संभ्रमात आहात ना, हे वाचा...

By हेमंत बावकर | Updated: January 20, 2021 12:50 IST

Want to Buy 5G Smartphone or 4g better choice : बाजारात मोटरोला, शाओमी, वनप्लस, रिअलमी  सारख्या कंपन्या 5G फोन आणू लागल्या आहेत. सध्या सर्वात स्वस्त असलेला 5G स्मार्टफोन हा मोटरोलाचाच आहे. त्यानंतर अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. परंतू, यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी 4G की 5G स्मार्टफोन घ्यायचा यावरून कन्फ्यूजन पहायला मिळतेय. चला जाणून घेऊया...

- हेमंत बावकर

भारतात सध्या 5G तंत्रज्ञानाची चर्चा आहे. सध्या केवळ चर्चाच आहे, बरं का. परंतू बाजारात मोटरोला, शाओमी, वनप्लस, रिअलमी  सारख्या कंपन्या 5G फोन आणू लागल्या आहेत. सध्या सर्वात स्वस्त असलेला 5G स्मार्टफोन हा मोटरोलाचाच आहे. त्यानंतर अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. परंतू, यामुळे नवीन फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी 4G की 5G स्मार्टफोन घ्यायचा यावरून कन्फ्यूजन पहायला मिळतेय. चला जाणून घेऊया...

एक उदाहरण घेऊया, पती-पत्नीकडे सध्या दोन 4G फोन आहेत. परंतू पत्नीला नवीन फोन घ्यायचा आहे, मग नवीन तंत्रज्ञानाचा घ्यायचा की सध्या सुरु आहे त्या 4जीचा. 4जी फोन 6000 रुपयांपासून सुरु आहेत. तर 5जी चे फोन 20000 रुपयांपासून. भविष्याचा विचार करता तिप्पट पैसे घालून 5जीचा फोन घेणे परवडेल का? की त्यापेक्षा 9 ते 10 हजारांत चांगला फोन घेतला तर परवडेल असा प्रश्न पतीराजांच्या मनात घोळत आहे. पतीराज म्हणतायत ५जी आणि पत्नी म्हणतेय कशाला एवढे पैसे खर्च करताय, ४जीच घ्या. आता गणित समजून घेऊया.

 साधारण चार वर्षांपूर्वी 4जी ला सुरुवात झाली. पुणे, मुंबईसारख्या शहरांत पहिल्यांदा ट्रायल म्हणून देण्यात येत होते. ग्रामीण महाराष्ट्रात 4जी यायला साधारण दीड-दोन वर्षे गेली. मग अजून 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला नसताना, मुंबई-पुण्यात आलेले नसताना आणि त्यापलीकडे जाऊन अद्याप कंपन्यांची चाचणी प्रक्रिया सुरु झालेली नसताना 5 जी फोन घेणे परवडणारे असेल का, नाही ना. अजून शहरातच आले नाही तर गावात कुठून येणार, हा प्रश्न देखील आहेच. 

यामुळे जर नवीन फोन घ्यायचा असेल तर गावातील लोकांना 4जी शिवाय पर्याय नाही. जसे ४जी फोन स्वस्त झाले तसे ५जी फोनही स्वस्त होतील. कारण गेल्या आठवड्यात कमी किंमतीच्या 4जी फोनसाठी जो चिपसेट लागतो तसाच चिपसेट 5जीसाठी विकसित झाला आहे. मग आता 20000 ते 50000 रुपयांचे 5G स्मार्टफोन विकत घेऊन ते पुढील वर्षभर 4जीसाठी वापरणार आणि वर्षभराने त्या फोनची किंमत निम्मी होणार, या व्यवहारात काय हशील. कदाचित सहा महिन्यांनी आणखी काहीतरी नवीन फिचर असलेले फोन 20000 हजारात मिळू शकतील. 

देशात 5G चे इन्फ्रास्ट्रक्चर कधीपर्यंत उपलब्ध होईल, स्पेक्ट्रम लिलाव परवडणारे असतील की नाही, कंपन्या स्पेक्ट्रम घेतील की नाही हे देखील माहिती नाहीय. 5G चे नेटवर्क उभारण्यासाठी जो पैसा लागेल तो कुठून येणार हा देखील एक या महामंदीच्या काळातला मोठा प्रश्नच आहे. कंपन्यांनाही माहिती नाहीय की यातून फायदा होईल की नाही. व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल या कंपन्या सध्या लॉस मध्ये आहेत. एकटी जिओच फायद्यात चाललेली आहे. बीएसएनएलकडे तर अद्याप ४जी देखील आलेले नाही. 

शहरांमध्ये ५जी उपयुक्त?5G चे नेटवर्क जरी शहरात आले तरीही ते हाय स्पीड असल्याने अडथळे पार करू शकणार नाही. यामुळे शहरांतील इमारतींमध्ये हे नेटवर्क जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर टॉवर उभारावे लागणार आहेत. यासाठीदेखील खर्च मोठा आहे. शहरात हा खर्च भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतीलही. यामुळेच जगभरातही केवळ शहरांतच ५जी नेटवर्क देण्यात येत आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करता ग्रामीण काय की शहरी काय, सध्याच्या काळात ५जी फोन न घेता ४जी घेतलेला उत्तम. ५जी नेटवर्क आल्यावरच 5G फोनचा विचार केल्यास फायद्याचे ठरेल. बाकी चारचौघांत मिरविण्यासाठी ५जी फोन घेतल्यास काहीच समस्या नाही.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानMotorolaमोटोरोलाxiaomiशाओमीOneplus mobileवनप्लस मोबाईल