शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अरे बापरे! हॅकर्सचा 'महाभयंकर' नवा प्लॅन; ५ कोटी युजर्ससाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:18 IST

भारत सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे.

भारत सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या फोनच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू शकते. हा धोक्याचा इशारा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने जारी केला आहे. रिपोर्टनुसार, सुरक्षा त्रुटीमुळे, हॅकर्स सहजपणे संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि फोनवर मनमानी कोड एक्सीक्यूट करू शकतात.

कोणत्या अँड्रॉइड व्हर्जनवर होणार परिणाम?

ही नवीन सिक्योरिटी रिस्क Android 12, 12L, 13, 14 आणि नवीनतम 15 व्हर्जनवर परिणाम करू शकते. भारतात या व्हर्जनवर चालणाऱ्या फोनची संख्या ५ कोटींपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, हा धोका खूप गंभीर मानला जात आहे आणि स्मार्टफोन ब्रँड्सनी तो गांभीर्याने घेणं आवश्यक आहे, जेणेकरून युजर्सना संभाव्य सायबर हल्ल्यांपासून वाचवता येईल.

सुरक्षेतील त्रुटी

CERT-In च्या मते, ही सुरक्षा त्रुटी अनेक महत्त्वाच्या कंपोनेंट्समध्ये आढळून आली आहे.

• अँड्रॉइडची फ्रेमवर्क आणि सिस्टम• ARM कंपोनेंट्स•  Imagination Technologies कंपोनेंट्स• MediaTek चिप्स• Qualcomm चिप्स आणि त्याचे क्लोज्ड-सोर्स कंपोनेंट्स

या हार्डवेअरशी संबंधित समस्यांमुळे, जवळजवळ सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन ब्रँड आणि त्यांचे युजर्स सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात.

तुमचा फोन कसा सुरक्षित ठेवायचा?

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे गुगलने आधीच एक अपडेट जारी केला आहे. सर्व अँड्रॉइड युजर्सना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी त्यांचे फोन लवकरात लवकर अपडेट करावेत, जेणेकरून ते या धोक्यापासून वाचू शकतील.

तुमचा अँड्रॉइड फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा फॉलो

- फोनची सेटिंग्ज उघडा.

- सिस्टम अपडेट्स ऑप्शनवर जा.

- लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान