शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

5 जीचे काऊंटडाऊन सुरु; 100 दिवसांत चाचणी सुरु करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:17 IST

देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे.

नवी दिल्ली : देशात 5 जी सुविधा असणारे फोन विक्रीस सुरुवात झाली असून सरकारनेही कंबर कसली आहे. येत्या 100 दिवसांत 5 जी सेवेची चाचणी सुरु होणार असल्याची घोषणा दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताना केली. तसेच स्पेक्ट्रम लिलावही या वर्षीच केला जाणार असून अद्याप हुवाई कंपनीच्या सहभागाबाबत सांगता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशातील एक लाख गावांना डिजिटल बनविण्याचे लक्ष्य असल्याचे प्रसाद म्हणाले. टेलिकॉम उत्पादन वाढविण्यासोबतच तोट्यात असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचीही घोषणा त्यांनी केली. 

मनोज सिन्हा यांनी हे मंत्रालय गेली तीन वर्षे हाताळले होते. एक लाख गावांना डिजिटल करण्यासाठी पाच लाख वाय फाय स्पॉट तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, ई-हॉस्पिटल, ई-स्कॉलरशिप सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळेल. तसेच भारतनेट या ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड सुविधा देण्याच्या कामात वेग आणणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

 5 जी चाचणीसोबत स्पेक्ट्रम लिलाव आणि लायसन्सची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, यासाठी कंपन्यांना ही सुविधा समाजातील वंचित लोकांपर्यंत पोहोचविण्याची अट असणार आहे. परदेशी कंपन्या लिलावात भाग घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच 5 जी सेवेमध्ये अग्रेसर असलेली कंपनी हुवावे भारतात सहभागी होईल का यावर अद्याप कल्पना नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले. या कंपनीच्या एका उपकंपनीवर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका बसल्यास हुवाईची उपकरणे भारतात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेट