शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांची भारतालाच धमकी? म्हणे, उत्पादन बंद करून टाकू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:23 IST

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी परवडणारे नाही.

व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या चिनी कंपन्या आता भारतालाच डोळे वटारू लागल्या आहेत. भारतीयांनी देखील Oppo, Vivo, Xiaomi सारख्या चिनी स्मार्टफोन कंपन्यांना डोक्यावर घेतल्याने त्यांचे फावले आहे. यामुळे भारतात तेव्हा चालणाऱ्या मायक्रोमॅक्स, लावा सारख्या कंपन्यांना गायब व्हावे लागले होते. आता या चिनी कंपन्या भारताला उत्पादनच बंद करण्याची आडून आडून धमकी देत आहेत. 

या चिनी कंपन्यांनी तशी योजना बनविली आहे. भारतात स्मार्टफोन बनवणाऱ्या चिनी कंपन्यांवर सरकारची कडक कारवाई बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या कंपन्यांनी भारताचा मोठा कर चुकविला आहे. चिनी कंपन्यांची ही कृत्ये उघड झाल्याने स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडाली होती. या कंपन्यांच्या कार्यालयावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणी कंपन्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे, मात्र तरीही सरकारने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही, त्यामुळे या कंपन्या आता नाराज झाल्या आहेत.

चिनी कंपन्यांनी भारताने सुरु केलेल्या कारवाईविरोधात आपले प्लँट बाहेरच्या देशांत नेण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. चीन सरकारची वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, चिनी स्मार्टफोन निर्माते इंडोनेशिया, बांगलादेश, नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये उत्पादन प्रकल्प उभारू शकतात. भारत सरकारची कठोर कारवाई या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप यातून करण्यात आला आहे. 

परदेशी कंपन्या भारतात १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन बनवू शकत नाहीत, अशी अट भारत सरकार टाकत असल्याचे वृत्त आले होते. यावर चिनी कंपन्यांकडून परदेशात बाजारपेठा शोधण्याच्या शक्यतांचा विचार करत असल्याचे विधान आले होते. नंतर सरकारने ही अट बाजुला ठेवली. स्वस्त फोन देण्यात लावा आणि मायक्रोमॅक्स सारख्या कंपन्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न म्हणून सरकार असे पाऊल उचलू शकते, असा दावा केला जात होता. परंतू, भारताने पाऊल मागे घेतल्याने चिनी कंपन्यांना सुरक्षित असल्याचे वाटू लागले. यातूनच आता चिनी कंपन्यांची हाराकीरी वाढू लागली आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने चीनच्या कंपन्या विस्तारासाठी भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्लांट उभारू शकतात. पण भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत, अचानक उत्पादन बंद करणे हे कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठेला कायमचे गमावण्याचे मोठे कारण ठरू शकते. विक्री कमी झाल्यामुळे या कंपन्यांच्या कमाईवर जो परिणाम होईल तो तर विचारही करू शकणार नाहीत. यामुळे भारत सरकारवर दबाव टाकण्याचा हा चिनी कंपन्यांचा अजेंडा असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीनVivoविवोoppoओप्पो