शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:25 IST

Google CEO Sundar Pichai Warns: आर्टिफिशीअल इंटेलिजंस महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे

ठळक मुद्दे मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतच

सिलीकॉन व्हॅली: गुगल(Google) चे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुंदर पिचाई(Sundar Pichai) यांनी यूजर्सला मोठा इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथील Google मुख्यालयात BBC ला ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जगभरातील फ्री आणि ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ल्याचा धोका वर्तवला आहे.

यावेळी ते म्हणाले, अनेक देशात फ्री किंवा ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ले होत आहेत. पण, हे देश इतर देशांपर्यंत माहिती पोहचवण्यास उशीर करत असल्याने इतर देशांनाही याचा धोका वाढला आहे. तसेच, चीनच्या पाळत ठेवणाऱ्या इंटरनेट मॉडेलविषयी विचारले असता, त्यांनी थेट चीनचे नाव घेणे टाळले. पण, गुगलचे कोणतेच प्रमुख प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेजचीनमध्ये चीनमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी यूजर्सना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन(Two-factor authentication) करण्यासही सांगितले. 

मोबाईल कितीवेळ वापरावा ?यावेळी सुंदर पिचाई यांनी मुलांसाठीचा स्क्रीन टाइम, पासवर्ड कधी आणि किती लवकर बदलायला हवा आणि ते किती मोबाइल वापरतात, यावरही भाष्य केले. त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही मुलांना कितीवेळ मोबाईल पाहू देता? ते म्हणाले की, मोबाईल कितीवेळ वापरावा, हे मी मुलांनाच ठरवू देतो. मोबाईल ही वयक्तिक बाब आहे आणि तो वापरणाऱ्याने याचा वापर कसा करायचा, हे ठरवावे. 

पिचाई वापरतात 20 फोनयावेळी पिचाई यांना त्यांच्या फोनची संख्या विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, मी सध्या 20 पेक्षा जास्त फोनचा वापर करतो. मी सतत फोन बदलत असतो. नवनवीन फोनची माहिती घेत असतो. तसेच, त्यांना आर्टिफिशीअल इंटेलिजंस(Artificial intelligence)बद्दल विचारण्यात आले असता. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसाने तयार केले आहे. हे एक महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. याची तुलना विज किंवा इंटरनेटसारख्या गोष्टींसोबत करता येईल. मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला सर्वात ताकदवान तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो. 

मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतचपिचाई यांनी यावेळी आपण आज जे काही आहोत त्यात भारताचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले. मी एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु आजही माझ्या अंत:करणात भारत आहे. यामुळेच आज मी जे काही आहे त्यात भारताचा मोठा वाटा आहे, असे सुंदर पिचाई म्हणाले. 

क्वॉन्टम कंप्यूटिंगमुळे बदल घडेलसुंदर पिचाई यांनी सांगितल्यानुसार, क्वॉन्टम कंप्यूटिंग पूर्णपणे एक वेगळी कल्पना आहे. ही सामान्य कंप्यूटिंग बायनरीवर आधारीत आहे किंवा यांना बिट्स म्हणता येईल. क्वॉन्टम कंप्यूटर क्यूबिट्सवर काम करते. यामुळे एक पदार्थ एकाचवेळी अनेक स्टेट्समध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला इतक्या लवकर समजणे अवघड आहे, पण येणाऱ्या काळात यामुळे क्रांती नक्की घडेल, असे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचईcyber crimeसायबर क्राइमInternetइंटरनेटAmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्निया