शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 06:03 IST

गुगल इंडियाचे निरीक्षण; ‘पहले सेफ्टी, फिर इंटरनेट’ अभियानाद्वारे सुरक्षेबाबत करणार साक्षर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेट असुरक्षिततेमुळे जगभरात हॅकिंगमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण गुगल इंडिया ट्रस्ट अ‍ॅण्ड सेफ्टी विभागाचे संचालक सैकत मित्रा यांनी सांगितले. मागील काही वर्षांत इंटरनेटची उपलब्धता झपाट्याने वाढली आहे; मात्र इंटरनेट साक्षरता नसल्यामुळे हॅकिंगचे प्रमाण वाढल्याचेही सैकत यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने गुगल इंडियाच्या वतीने ‘पहले सेफ्टी’ अभियानाच्या माध्यमातून नेटीझन्सना इंटरनेट सुरक्षेविषयी साक्षर करण्यात येणार आहे.

गुगल इंडियाचे सैकत मित्रा यांनी सांगितले, आजच्या काळात इंटरनेट साक्षरता खूप महत्त्वाची आहे. सध्या आॅनलाइन पेमेंट, आॅनलाइन बँकिंग खूप सहज हाताळले जाते; मात्र त्यामागील सुरक्षितता पडताळली जात नाही. या कारणामुळे सहज हॅकिंग, पैशांची फसवणूक केली जाते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी गुगलने खास अभियान हाती घेतले असून डेटा सिक्युरिटी काऊन्सिल आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने काम करणार आहे.

याशिवाय, काही खासगी संस्था आणि कंपन्यांसोबतही या अभियानाच्या माध्यमातून युझर्सना ुंइंटरनेट सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.हॅकिंग व फसवणुकीचा धोका ओळखून गुगलने स्वत: पुढाकार घेऊन इंटरनेटवरून काही साइट्स ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशी चुकीची किंवा खोटी संकेतस्थळे, अ‍ॅप्स गुगलवर थेट सुरूच होणार नाहीत याची काळजी आम्ही घेत आहोत, असे मित्रा यांनी सांगितले. तर डेटा सिक्युरिटी काउन्सिल आॅफ इंडियाच्या अमित घोष यांनी सांगितले, डिजिटल पेमेंट अभियान सात भाषांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या खेड्यापाड्यांत जिथे इंटरनेट उपलब्धता वेगाने वाढतेय, तिथे साक्षरताही वाढावी असा प्रयत्न आहे.पासवर्ड स्ट्राँग करणे गरजेचेइंटरनेट साक्षरतेसाठी अगदी सोशल मीडियाच्या अकाउंट पासवर्डपासून ते अगदी आॅनलाइन पेमेंटसाठी वापरण्यात येणारे पासवर्ड स्ट्राँग करण्याचा सल्ला गुगल इंडियाच्या तज्ज्ञांनी दिला. शिवाय, फोन्समध्ये सेव्ह करण्यात येणारे इमर्जन्सी संपर्कही ‘आॅनर इर्न्फोमेशन’ या विभागात फीड केल्यास त्याचा आपत्कालीन परिस्थितीत वापर होऊ शकतो, असे ते म्हणाले. आपल्या सर्व सोशल मीडियाचे स्रं२२६ङ्म१.िॅङ्मङ्मॅ’ी.ूङ्मे या संकेतस्थळावर पडताळूनही पाहता येतील. तसेच सोशल मीडियावर बऱ्याच वर्षांपासून असणारे पासवर्ड काही वर्र्षांनंतर बदलावेत; त्यामुळे इंटरनेटची असुरक्षितता टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :googleगुगलInternetइंटरनेट