शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

#HappyNewYear : व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा खच, भारतातून तब्बल २ अब्ज संदेशांची देवाणघेवाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 17:10 IST

नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतासह जगात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावेळी देवाण-घेवाण केलेल्या संदेशांचा आकडा थक्क करणारा आहे.

ठळक मुद्देनववर्षाच्या शुभेच्छा देताना रात्री बरोबर १२ वाजता व्हॉट्सअॅप तब्बल २ तास बंद पडलं होतं. त्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअॅप बंद पडल्याच्या तक्रारी ट्विटरद्वारे द्यायला सुरुवात केली होतीअनेक नविन अॅप आले आणि गेले मात्र व्हॉट्सअॅपची जागा कोणत्याच अॅपने घेतली नाही.

मुंबई : नववर्षाच्या शुभेच्छा देताना रात्री बरोबर १२ वाजता व्हॉट्सअॅप तब्बल २ तास बंद पडलं होतं. त्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअॅप बंद पडल्याच्या तक्रारी ट्विटरद्वारे द्यायला सुरुवात केली होती. २ तासांनी व्हॉट्सअॅप सुरू झालं तेव्हा कित्येकजण झोपी गेले होते. पण आता अशी माहिती समोर येतेय की, नवीन वर्षात शुभेच्छा देण्यासाठी तब्बल २० अब्ज संदेश भारतीयांकडून पाठविण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपनेच याविषयी अधिकृत माहिती दिलीय. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी आकडेवारी असल्याचंही सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप खरंतर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं अॅप आहे. आजवर मॅसेजिंगचे असंख्य अॅप आले. मात्र तरीही व्हॉट्सअॅपची जागा कोणत्याच अॅपने घेतली नाही. रोज असंख्य मॅसेज या व्हॉट्सअॅपद्वारे केले जातात. आजवर जगभरात जवळपास २ बिलिअन युजर्स व्हॉट्सअॅपला लाभले आहेत. म्हणूनच नववर्षाच्या स्वागताचे संदेश देण्यासाठी युजर्सने व्हॉट्सअॅपचा अधिक वापर केला. 

व्हॉट्सअॅपने या रिलीजमध्ये सांगितलंय की, ‘नविन वर्षाचा दिवस व्हॉट्सअॅपवर अधिक संदेश पाठवणारा दिवस ठरला. गेल्यावर्षी ही आकडेवारी १४ अब्ज ए‌वढी होती. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते दुसऱ्यादिवशी म्हणजेच १ जानेवारी ११.५९ पर्यंतची ही आकडेवारी आहे. तर संपूर्ण जगभरात तब्बल ७५ अब्ज संदेश पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये १३ अब्ज फोटो अआणि ५ अब्ज व्हिडिओ आहेत. दोन तास व्हॉट्सअॅप बंद राहूनही ए‌वढी मोठी आकडेवारी समोर आली आहे, जर त्यादिवशी व्हॉट्स अॅप डाऊन झालं नसतं तर हीच आकडेवारी कदाचित मोठी असली असती.’ 

गेल्या वर्षभरात व्हॉट्सअॅपने अनेक फिचर्स लॉन्च केले. त्यामुळे युजर्स जास्तीत जास्त प्रभावित होत गेले. आज प्रत्येक स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तीकडे व्हॉट्सअॅप आहे. व्हिडिओ कॉलिंगपासून ते एकमेकांचे स्टोरी अपडेट पाहण्यापर्यंत सारंकाही व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिल्याने इतर अनेक अॅप मागे पडले. दिवसेंदिवस अपडेट होत राहणाऱ्या व्हॉट्सअॅपने त्यांच्या युजर्सची संख्याही वाढवत नेली. त्यामुळेच नविन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक संदेश व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आले. केवळ २२ तासात फक्त भारतातून २० अब्ज संदेश पाठवण्यात आले आणि जगभरातून ७५ अब्ज संदेश पाठवण्यात आले. साहजिकच सर्वाधिक संदेश पाठवण्यासाठी नविन वर्ष हा दिवस फार महत्त्वाचा ठरला आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपNew Year 2018नववर्ष २०१८Indiaभारत