शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:06 IST

6G in India : आशियामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

6G in India : सध्या हायस्पीड इंटरनेटचे युग आहे. लोकांना फास्ट इंटरनेट सर्व्हिस हवी आहे. सध्या देशात 4G आणि 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत आहे. पण, आता देश 6G इंटरनेटकडे वाटचाल करत आहे. भारत 15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्ली (WTSA) आयोजित करणार आहे. यामध्ये 190 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा कार्यक्रम म्हणजे सर्व प्रतिनिधींना देशातील 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मोठा डेटा यांसारख्या महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीवर चर्चा करण्यासाठी एक मंच असणार आहे. 

आशियामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, ग्लोबल पेटंट फाइलिंगमध्ये भारताने पहिल्या सहा देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे. कारण भारत जागतिक स्तरावर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पुढे जात असल्याचे यातून दिसून येते. तसेच, आत्तापर्यंत 4G आणि 5G सर्व्हिस देशात हाय इंटरनेट स्पीडसाठी उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या लोकांना 4G इंटरनेट सर्व्हिस देत आहेत. परंतु, 6G सर्व्हिस अद्याप मिळत नाही. 

वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्ली या कार्यक्रमाचे आयोजन इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनद्वारे (ITU) केले जाते. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही युनायटेड नेशन्सची एक एजन्सी आहे, जी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या विकासाला आणि वापराला प्रोत्साहन देते. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्लीमध्ये सहभागी होण्यासाठी येणारे प्रतिनिधी 6G साठी आवश्यक असलेल्या मानकांवर चर्चा करतील. 

दरम्यान, 6G हे पुढील पिढीचे मोबाइल नेटवर्क टेक्नॉलॉजी आहे. ते 5G पेक्षा कितीतरी पटीने वेगवान आणि अधिक विश्वासार्ह असेल. 6G चा वापर जलद आणि सहज कार्य पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतात वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्लीचे आयोजन करणे ही एक महत्त्वाची संधी आहे. यामुळं भारताला जागतिक स्तरावर तांत्रिक नेतृत्व दाखवण्याची संधी मिळेल. हे भारताला इतर देशांशी सहकार्य करण्याची आणि जागतिक तांत्रिक मानके विकसित करण्याची संधी देखील प्रदान करेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल