शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात भारतीय - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 14:44 IST

एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही

मुंबई - सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. एकवेळ आपलं पाकिट घरी विसरल्यावर जितकं टेंशन येणार नाही त्याहून जास्त टेंशन मोबाइल किंवा स्मार्टफोन विसरलो तर येतं. मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे. एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही. एका सर्व्हेनुसार, तंत्रज्ञानाचा फास इतका आवळला आहे की लोक नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व देऊ लागले आहेत. लोक आजकाल आपल्या मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

जवळपास 33 टक्के लोक ज्यांच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्यांचा जन्म डिजीटल युगात झाला आहे. हे लोक आपल्या स्मार्टफोनला जवळपास असणा-या लोकांपेक्षा जास्त महत्व देतात. भारतात हे प्रमाण सर्वात जास्त असून पहिल्या क्रमांकावर आहे. 

मोटोरोलाने नुकताच एक सर्व्हे केला असून यामध्ये हा खुलासा केला आहे. मोटोरोलाने हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून हा सर्व्हे केला आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांनी स्मार्टफोन आपला बेस्ट फ्रेंण्ड असल्याचं सांगितलं आहे. स्मार्टफोन आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा समतोल राखण्याची इच्छा असणा-यांमध्येही भारत टॉपवर आहे. जवळपास 64 टक्के भारतीयांनी आपल्या दैनंदिन आयुष्य आणि स्मार्टफोन वापरात समतोल राखला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा आल्याचंही अनेकांनी कबूल केलं आहे. जवळपास 50 टक्के लोकांनी सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाइल फोन चेक करतो असं मान्य केलं आहे. याबाबतीतही भारत इतर देशांच्या तुलनेत पुढे आहे. 35 टक्के लोकांनी आपण स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च करतो अशी कबुली दिली आहे. यामधील जवळपास 44 टक्के लोक असे आहेत ज्यांचा जन्म 1990 ते 2000 दरम्यान झाला आहे. स्मार्टफोनसाठी कमीत कमी वेळ देणे आपल्या हिताचं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.