शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:34 IST

Internet Connections in India: 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.

Internet Connections in India :केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत ही माहिती दिली. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात (मार्च 2024) सध्या एकूण 95.44 कोटी इंटरनेट युजर्स आहेत, त्यापैकी 39.83 कोटी ग्रामीण भारतातील आहेत.

मंत्रालयाने पुढे सांगितले की, देशातील एकूण 6,44,131 पैकी 6,12,952 खेड्यांमध्ये (एप्रिल 2024) 3G/4G मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, देशातील 95.15 टक्के गावांमध्ये इंटरनेट सुविधा आहे. 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत, सरकारने मेट्रो, टियर-2 आणि टियर-3 शहरे, तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

आकडा 25.15 कोटींवरुन 95.44 कोटी झालामागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या 25.15 कोटींवरुन 95.44 कोटी झाली आहे. वार्षिक आधारावर 14.26 टक्के CAGR ची वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले. 

सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर लावण्याच्या नियमात बदलग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा देण्यासाठी सरकारने 'भारतनेट' प्रकल्प सुरू केला. देशातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडणे, हा त्याचा उद्देश होता. सरकारने सांगितले की 2.2 लाख ग्रामपंचायतींपैकी 2.13 लाख ग्रामपंचायती भारतनेटशी जोडल्या गेल्या आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये सरकारने सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर बसवण्याच्या नियमात बदल केला होता, जेणेकरून अधिकाधिक लोकांना मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देता येईल.

टॅग्स :InternetइंटरनेटSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेलBSNLबीएसएनएलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Central Governmentकेंद्र सरकार