शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लेट हाय पण थेट हाय! 5G मध्ये भारत जगात पाचवा; पहिल्या देशाचे नाव तर ऐकलेही नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 12:37 IST

फाईव्ह जी सेवा अद्याप मेट्रो आणि मध्यम शहरांमध्येच पोहोचल्या आहेत. तालुकापातळीवरील छोटी शहरे, गावे अद्याप यापासून लांबच आहेत. तरी देखील भारताने पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे.

कोरोनानंतर काही काळातच अमेरिका, चीन, युरोपमधील देशांनी ५जी सुरु केले होते, तेव्हा कुठे भारत त्याची तयारी करत होता. परंतू, उशिराने एन्ट्री झाली फार कमी काळात भारताने एवढी मोठी झेप घेतलीय की जगातील पहिल्या पाचात जाऊन बसला आहे.

5G ची सर्वाधिक उपलब्धता असलेल्या देशात भारताचा पहिल्या पाचात नंबर लागत आहे. एका वर्षातच भारताने ही कामगिरी केली आहे. यामुळे भलेभले विकसित देश यामध्ये मागे पडले आहेत. भारतात सध्या दोनच कंपन्या फाईव्ह जी सेवा देतात. १ ऑक्टोबर २०२२ ला पहिल्यांदा एअरटेलने फाईव्ह जी सेवा सुरु केली होती. त्यानंतर काही दिवसांनी रिलायन्स जिओने सुरु केली. परंतू, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी अद्याप फाईव्ह जी कडे ढुंकूनही पाहिलेले नाहीय. 

एअरटेल आणि जिओ या कंपन्यांची फाईव्ह जी सेवा अद्याप मेट्रो आणि मध्यम शहरांमध्येच पोहोचल्या आहेत. तालुकापातळीवरील छोटी शहरे, गावे अद्याप यापासून लांबच आहेत. तरी देखील भारताने पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. जेव्हा आणखी काही महिन्यांत सर्व देश व्यापला जाईल तेव्हा भारताचा पहिला किंवा दुसरा क्रमांक असेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सच्या एक्स हँडलवरून याबाबत एक ट्विट करण्यात आले आहे. यानुसार भारताने सर्वाधिक 5G उपलब्धता असलेल्या टॉप-5 देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 29.9 टक्के 5G उपलब्धतेसह भारत या यादीत 5 व्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर सिंगापूर 30 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून 31.1 टक्के लोकांना 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. दक्षिण कोरिया 42.9 टक्के सह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तु रिको पहिल्या स्थानावर आहे, त्यांच्या देशातील 48.4 टक्के लोकांकडे 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. या यादीत चीनचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

टॅग्स :5G५जीIndiaभारत