शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 13:59 IST

मे महिन्यात लँडलाइन ग्राहक मात्र वाढले; कंपन्या तरीही चिंतेत

मुंबई : कोरोनामुळे माणसा-माणसांत निर्माण झालेले अंतर तंत्रज्ञानाने दूर केले असले तरी या काळात तंत्रज्ञानापासून फारकत घेतलेल्यांची संख्याही कमी नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६.२७ दशलक्ष ग्राहकांनी मोबाइल सेवा बंद केली आहे. त्यामुळे दुरावलेले हे ग्राहक पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी धडपड सुरू केली आहे.

मोबाइल कंपन्यांच्या मे महिन्यातील कामगिरीचा एकत्रित अहवाल ‘ट्राय’ने नुकताच जाहीर केला. त्यानुसार देशातील एकूण मोबाइल वापरकर्त्यांची संख्या या काळात तब्बल ६.२७ दशलक्षांनी कमी झाली आहे. विशेष म्हणजे यात शहरी भागातील वापरकर्ते सर्वाधिक म्हणजे ४.१४ दशलक्ष इतके आहेत; तर ग्रामीण क्षेत्रातील संख्या २.१४ दशलक्ष इतकी आहे. एप्रिल महिन्यात देशभरात १२०३.४७ दशलक्ष मोबाइल ग्राहक होते. मे महिन्यात ही संख्या ११९८.५० दशलक्ष इतकी नोंदविण्यात आली.

असे असले तरी मे महिन्यात लँडलाइन ग्राहकांची संख्या मात्र वाढली आहे. या काळात १.३० दशलक्ष नागरिकांनी नवीन लँडलाइन जोडणी घेतली. त्यामुळे या क्षेत्राचा मासिक वृद्धिदर ६.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. देशभरात २१.६६ दशलक्ष लँडलाइनधारक असून, शहरी भागात १९.७० दशलक्ष आणि ग्रामीण भागात १.९६ दशलक्ष लँडलाइन वापरकर्ते आहेत. ब्रॉडबँड ग्राहकांचा विचार करता, मे महिन्यात ही संख्या ७८०.२७ दशलक्षांवर पोहोचली आहे. त्यात वायरलेस ७५७.५३, तर २२.७४ वायरलाइन ग्राहकांचा समावेश आहे.

कोणत्या कंपनीचे किती ग्राहक कमी झाले?

मे महिन्यात देशभरात ६२ लाख ७३ हजार ८९० ग्राहकांनी मोबाइलला रामराम केला आहे. त्यात भारती एअरटेलचे सर्वाधिक (४६,१३,५२१) ग्राहक कमी झाले असून, त्या खालोखाल व्होडाफोन आयडिया (४२,८१,५३२), बीएसएनएल (८,८०,८१०), एमटीएनएलची (२,४३६) ग्राहकसंख्या कमी झाली आहे. मात्र, रिलाइन्स जीओच्या ग्राहकसंख्येचा आलेख चढाच असून, या महिन्यात त्यांनी ३५ लाख ५४ हजार ७२२ नवे ग्राहक जोडले आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायIndiaभारत