शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

नव्या IT नियमांमुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; चुकीची पोस्ट केली तर तत्काळ कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 6:02 PM

आयटी नियमांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे सोशल मीडिया कंपन्यांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची जबाबदारी येणार आहे.

आयटी नियमांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे सोशल मीडिया कंपन्यांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची जबाबदारी येणार आहे. जेणेकरून कोणतीही बेकायदेशीर घटना किंवा चुकीची माहिती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सामग्री आणि इतर समस्यांबाबत दाखल केलेल्या तक्रारींचा योग्य निपटारा करण्यासाठी सरकारनं शुक्रवारी तीन महिन्यांत अपील समित्यांची स्थापना, आयटी नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. या समित्या मेटा आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया कंपन्यांद्वारे सामग्रीच्या नियमनाबाबतच्या निर्णयांचे पुनरावलोकन करण्यास सक्षम असतील.

त्रिसदस्यीय तक्रार अपील समित्या (जीएसी) स्थापनेची माहिती देताना चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करत नाहीत याबद्दल नागरिकांकडून लाखो मेसेज सरकारला येत असल्याचं म्हटलं. हे सरकारला अजिबात मान्य नसल्याचंही ते म्हणाले. चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत डिजिटल माध्यमांमध्ये नागरिकांचे हित जपले जाईल याची खात्री करण्यासाठी सरकार सोशल मीडिया कंपन्यांसोबत भागीदार म्हणून काम करू इच्छित असल्याचेही सांगितले. 

"पूर्वी युझर्सना नियमांची माहिती देण्याची जबाबदारी मध्यस्थांची होती पण आता या व्यासपीठावर आणखी काही जबाबदाऱ्या निश्चित करुन देण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणताही बेकायदेशीर मजकूर पोस्ट होऊ नये यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील", असं स्पष्ट शब्दात चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना चंद्रशेखर यांनी कठोर शब्दात सुनावले. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे अमेरिका किंवा युरोपमधील आहेत, जर ते भारतात काम करत असतील तर त्यांची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे भारतीयांच्या घटनात्मक अधिकारांशी तडजोड करू शकत नाहीत, असंही चंद्रशेखर म्हणाले. 

चुकीच्या पोस्टवर ७२ तासांच्या आत कारवाई अपेक्षित"सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ७२ तासांच्या आत कोणतीही खोटी माहिती, बेकायदेशीर सामग्री किंवा विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणारी माहिती काढून टाकण्याचे बंधन आहे", असं चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडिया कंपन्या बेकायदेशीर माहितीवर त्वरित कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, असंही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया