शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
3
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
4
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
5
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
6
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
7
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
8
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
9
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
10
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
11
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
12
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
13
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
14
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
15
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
16
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
17
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
18
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
19
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
20
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 3:15 PM

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे आज निधन झाले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांचे निधनाने जगभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. तसेच त्यांनी टेलिकॉम क्षेत्रातही जिओ येण्याआधी मोठी क्रांती केली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी २००८ मध्येच टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समूहाचा विस्तार करताना, त्यांनी अनेक नवीन व्यवसाय सुरू केले, त्यापैकी टाटाची दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस होती, या कंपनीने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले.

कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते

टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo कंपनी भारतात सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांना देशात मोबाईल कॉलिंग परवडणारी सेवा द्यायची होती. त्यावेळी खासगी कंपन्या भारतात मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. यावेळी टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.

टाटा डोकोमोने १ पैसा प्रति सेकंद दर योजना लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट चार्ज करत होती. म्हणजे जर तुम्ही १० सेकंद किंवा 59 सेकंद बोलला तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह जेवढं बोलाल तेवढे पैसे अशी बिलिंग प्रणाली लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट केला आहे.

दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. उद्योगपती रतन टाटा यांनी कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. यासह त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, हे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.

रतन टाटा यांच्या फुल प्रुफ प्लॅनिंगमुळे ही कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने फक्त ५ महिन्यांत १० मलियनहून अधिक ग्राहक जोडले आहेत. यानंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.

टाटा डोकोमोच्या भारतात सुरू झाल्यानंतर एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या २९ टक्क्यांनी वाढून ४३ टक्क्यांवर गेली होती. २००९ मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या ५० कोटी होती, ही संख्या २०१४ पर्यंत ८० कोटींवर गेली होती.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानRatan Tataरतन टाटा