शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

50000 रुपयांचा मोबाईल 7500 ने स्वस्त होणार; इंपोर्ट ड्यूटी कमी केल्याचे आणखी काही फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:27 IST

गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते.

देशात स्मार्टफोन क्रांती घेऊन आला आहे. करोडो लोक एकमेकांसोबत जोडले गेले आहेत. फाईव्ह जी सेवा बहुतांश ठिकाणी सुरु झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने बजेटपूर्वी मोबाईल फोनच्या सुट्या भागांवर आकारली जाणारा आयात कर कमी केला आहे. यामुळे ५०००० रुपयांचा फोन साडे सात हजारांनी तर आयफोनसारखा महागडा लाख रुपयांचा फोन १५००० रुपयांनी कमी होणार आहे. 

इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे किंमत कमी होण्याबरोबरच आणखी काही फायदे देखील देशाला होणार आहेत. बॅटरी, मेन लेन्स आणि अन्य सुटे भाग यामध्ये १० टक्क्यांची कपात होऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा डबल स्पीडने फायदा होणार आहे. स्मार्टफोन बनविण्याचा खर्च कमी होणार आहे. यामुळे मोबाईल मॅन्युफॅक्चरींगमध्ये वाढ होणार आहे. 

यामुळे अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. रोजगार उपलब्ध झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. सरकारने मोबाईल फोन आणि त्याच्या पार्ट्सवरील आयात शुल्क हटवल्याने हाय-एंड स्मार्टफोनच्या निर्मितीला वेग येईल. कमी किंमतीच्या स्मार्टफोनच्या किंमती देखील त्या प्रमाणात कमी होतील. परंतु Apple, Samsung, Vivo आणि Oppo च्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत. भारतात विकले जाणारे ९९.२ टक्के मोबाईल फोन देशातच बनवले जातात.

गेल्या १० वर्षांपासून कंपन्या आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत होत्या. परंतु या कंपन्या भारताबाहेर मोबाईल उत्पादन करत असल्याने भारत सरकार यासाठी तयार नव्हते. आता भारतातच मेड इन स्मार्टफोन बनू लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. याला बुस्टर मिळण्यासाठी त्यांचे पार्ट्सचे दर कमी करण्यासाठी कर कमी करण्यात आला आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन