शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बालमनाला स्मार्टफोनचा विळखा

By अनिल भापकर | Updated: March 19, 2019 13:47 IST

हल्लीच्या मुलांना खेळाची नावं सांगा म्हटलं कि हि मुलं लगेच पबजी ,कँडीक्रश , स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, कार रेस, तीनपत्ती आदी स्मार्टफोन गेम्सची नाव घेतात.

ठळक मुद्दे बाळाचा जन्म झाला कि अनेक नातेवाईक लगेच त्या कोवळ्या जीवासोबत सेल्फी काढायला सुरुवात करतातमुलांना स्मार्टफोन पासून हळूहळू दूर करणे हे पालकांचे कर्तव्य नव्हे तर गरज आहे.

अनिल भापकर

आमच्या लहानपणी कोणी मुलांना खेळाची नावे सांगा म्हटलं कि मुलं पटापट कब्बडी ,खो-खो, लपाछपी ,क्रिकेट ,कॅरम ,चेस आदी खेळांची नावं सांगायची . हल्लीच्या मुलांना खेळाची नावं सांगा म्हटलं कि हि मुलं लगेच पबजी ,कँडीक्रश , स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, कार रेस,  तीनपत्ती आदी स्मार्टफोन गेम्सची नाव घेतात.

हे असे का घडते ?

आजच्या पिढीतील मम्मी पप्पा हे पूर्वीच्या आईबाबांच्या तुलनेने डिजिटली अधिक स्मार्ट आहेत . त्यामुळे ह्या टेक्नोसॅव्ही काळात घरातील प्रत्येक मोठ्या माणसांकडे स्मार्टफोन हा असतोच. काही जण तर दोन-दोन स्मार्टफोन बाळगतात . घरातले हे मोठे जेव्हा ऑफिस मधून घरी येतात तेव्हा घरी आल्यावर एकमेकांशी गप्पा मारण्याऐवजी आपापल्या स्मार्टफोन मध्ये डोकं घालून बसतात . हे सगळे घरातील लहान मुलं बघत असतात. खरं तर लहान मुलांची आणि स्मार्टफोनची ओळख हि जन्मतःच होते कारण बाळाचा जन्म झाला  कि मामा ,काका ,पप्पा ,आत्या असे एक ना अनेक नातेवाईक लगेच त्या कोवळ्या जीवासोबत सेल्फी काढायला सुरुवात करतात . मुलं थोडी मोठी झाली कि घरातील व्यक्तीला त्यांच्या कामात डिस्टर्ब करते म्हणून त्याला स्मार्टफोन वर कार्टून लावून दिली जातात . आईलाही तिची कामे भरभर आवरण्याची मोकळीक मिळते . मग मुलं त्यात एवढी गुरफटून जातात कि त्यांना खाण्यापिण्याचेही भान  राहत नाही. मग हीच मुलं थोडं मोठी झाली कि स्मार्टफोनवर फोटो काढण्यापासून ते गेम्स डाउनलोड करणे आणि तासंतास खेळणे यात अगदी पारंगत होऊन जातात .मग घरातील वडीलधारी मंडळी घरी आली कि हि मुलं त्यांच्याशी बोलण्याऐवजी त्यांना त्यांचा स्मार्टफोन हवा असतो आणि जर दिला नाही तर हि लहान मुलं लगेच रडून सगळं घर डोक्यावर घेतात.

स्मार्टफोन लहान मुलांसाठी हानिकारकच

१. एकटक स्क्रीनकडे पहात राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो व डोळे कोरडे होतात त्यामुळे कमी वयात चष्मा लागण्याची शक्यता असते.

२. स्मार्टफोन मधील हिंसक गेम्स मुळे मुलांची प्रवृत्ती हिंसक होऊ शकते .

३. एका जागेवर बसून स्मार्टफोनवर गेम्स खेळायची सवय लागल्यामुळे मैदानी खेळ व त्यातील चुरस याला हि मुलं पारखी होतात .तसेच शारीरिक श्रम     नसल्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम सुद्धा होतो .

४. फोनवर सतत खेळत बसल्याने मुलांचा आई वडिलांशी तसेच मित्रांशी संवाद कमी होत जातो त्यामुळे हि मुले एकलकोंडी होत जातात व पुढे  पालकांपासून दूराऊ शकतात .

५. लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्यामुळे चुकून कोणाला कॉल लागू शकतो किंवा मेसेज फॉरवर्ड होऊन समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे मुलांना स्मार्टफोन पासून हळूहळू दूर करणे हे पालकांचे कर्तव्य नव्हे तर गरज आहे. त्याला इतर खेळात गुंतवून तसेच त्याच्याशी गप्पा मारून किंवा पालकांना वेळ असल्यास मुलांना खेळाच्या मैदानावर घेऊन जायला हवे. एकीकडे खेळाची मैदाने नाहीत म्हणून आपण ओरड करतो मात्र जी काही थोडी फार मैदाने आहेत त्यावर तरी मुलं खेळायला येतात का हे आपण बघतच नाही.

anil.bhapkar@lokmat.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलParenting Tipsपालकत्व