शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

स्मार्टफोनमुळे वाढले नवरा-बायकोतील अंतर; वैवाहिक नात्यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:48 IST

विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सतत फोनमध्ये डोके घालून राहिल्याने एकाच घरात राहूनही विवाहित जोडप्यांच्या संबंधांवर धक्कादायक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८८ टक्के विवाहित भारतीयांना असे वाटते की स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या नातेसंबंधांचे मोठे नुकसान झाले असून, नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे घरामध्ये स्मार्टफोनचा वापर धोकादायक ठरू लागला आहे.

विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले. यामध्ये दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील एक हजाराहून अधिक लोकांचा सहभाग होता.

नाते हवे, पण वेळ देऊ शकत नाहीलोकांचा विश्वास आहे की स्मार्टफोनऐवजी, आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवल्याने त्यांना आनंद मिळतो. परंतु तरीही ते कमी वेळ घालवतात. बहुतांश लोकांना यात बदल हवा आहे. 

जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत ६७% लोकांनी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवताना फोनवर व्यस्त असल्याचे कबूल केले. ८९% लोकांनी कबूल केले की ते त्यांच्या जोडीदाराशी बोलण्यात कमी वेळ घालवत आहेत. ६६% लोक म्हणतात की, फोनमुळे जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत झाले आहे.

लोक म्हणतात की, आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आहे.

लोक मान्य करतात की, स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे त्यांचे जोडीदारासोबत असलेले संबंध अधिक ताणले गेले आहेत.

म्हणतात की, स्मार्टफोन त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.

लोक मान्य करतात की, ते स्मार्टफोनमध्ये इतके गुंग होऊन जातात की त्यांच्या आजूबाजूला काय घडतेय याचे त्यांना भान नसते.

लोक कुटुंबासोबत बसून चर्चा करण्याऐवजी फोनमध्ये गुंग राहतात.

टॅग्स :marriageलग्न