शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:04 IST

कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.

गेले काही महिने देशातील स्मार्टफोन कंपन्या आपल्या मोबाईल्सच्या किंमती वाढवत आहेत. या महागाईतून दिलासा मिळण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत कारण भारतीय स्मार्टफोन ग्राहकांना अजून एक झटका लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही महिन्यात ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागेल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता फोन विकत घेणे फायदेशीर ठरू शकतो.  

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या काळात स्मार्टफोन कंपन्या सध्या उपलब्ध असलेल्या फोन्सच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. सध्या जरी बरेचशे फोन्स भारतात बनत असले तरी कच्चा माल अजूनही चीनमधून येत आहे. या कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.  

कोरोना महामारीमुळे घरून काम करणाऱ्यांचे आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि लॅपटॉप्सच्या मागणीत वाढ झाली आहे. हे डिवाइस बनवण्यासाठी लागणाऱ्या कंपोनंट्सच्या किंमती चीनमध्ये वाढल्या आहेत. तसेच काही कंपोनंटस बाजारात उपलब्ध देखील होत नाहीत. या सर्वांचा दबाव गॅजेट्स निर्माता कंपन्यांवर पडत आहे. त्यामुळे मागणी जास्त असूनही सणासुदीच्या काळात स्मार्टफोन कंपन्या आपल्या जुन्या तसेच नव्या स्मार्टफोन्सचे भाव वाढवू शकतात.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन