शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो..; टॉप IT कंपन्यांमध्ये नोकभरती घटली, काय आहे कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:39 IST

Tech Companies Hiring :सध्या भारतातील आयटी क्षेत्रात सूमारे 54 लाख कर्मचारी काम करतात.

Tech Companies Hiring : भारतातील IT क्षेत्रात 50 लाखांहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. पण, आता या क्षेत्रात AI तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक मोठे बदल घडताना पाहायला मिळत आहेत. AI च्या वापराने अनेक कामे ऑटोमॅटिक होत आहेत, त्याचा परिणाम आयटी कंपन्यांच्या नोकरभरतीवरही दिसून येत आहे. डिसेंबर तिमाहीत देशातील प्रमुख 5 आयटी कंपन्यांमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,587 ने कमी झाली आहे, तर सप्टेंबर तिमाहीत ही संख्या 15,033 ने वाढली होती.

या कालावधीत इन्फोसिस आणि एचसीएलने 7,725 लोकांना कामावर घेतले, तर देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या TCS, विप्रो आणि टेक महिंद्रा यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या घटली. या पाच आयटी कंपन्यांनी FY24 च्या डिसेंबर तिमाहीत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 12,132 ने कमी केली. FY24 च्या मार्च तिमाहीत एकूण 12,600 कर्मचारी कमी झाले. आर्थिक वर्ष 2025 ची शेवटची तिमाही सुरू आहे आणि उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की, यावेळी आयटी क्षेत्रात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एक चतुर्थांश कमी असेल.

गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत 60,000 ची निव्वळ वाढ झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या 54 लाखांवर पोहोचली आहे. IT इंडस्ट्री बॉडी NASSCOM ने तपशील दिलेला नाही, परंतु मोठ्या IT कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेता, असे मानले जाते की, बहुतांश भरती ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) मुळे होते. GCC सलग दुसऱ्या वर्षी निव्वळ वाढीमध्ये IT कंपन्यांना मागे टाकतील.

एव्हरेस्ट ग्रुपचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष पीटर बेंडर-सॅम्युअल यांनी सांगितले की, कोव्हिडदरम्यान उद्योगाने मोठ्या संख्येने लोकांची भरती केली. तेव्हापासून त्यांनी भरतीत कमालीची घट केली आहे. एचसीएलटेकचे सीईओ सी विजयकुमार म्हणाले की, आयटी कंपन्यांनी कमी कर्मचाऱ्यांमध्ये महसूल उत्पादकतेत वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने महसूलही वाढेल, असे नाही.  

टॅग्स :jobनोकरीInfosysइन्फोसिसWiproविप्रो