शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

व्होडाफोन-आयडियाचा ग्राहकांना जोरदार झटका; दंडाची रक्कम वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 09:22 IST

2017पासून कंपनीला नफाच झालेला नाही. कंपनीवर 14 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.

नवी दिल्ली : आतापर्यंतच्या ऐतिहासिक तोट्यामध्ये असलेली कंपनी व्होडाफोन- आयडियाने कोट्यवधी ग्राहकांनाच झटका दिला आहे. मागील कराच्या थकबाकीपोटी भारत सरकारने कंपनीला 4 अब्ज डॉलरचा भरणा करण्यास सांगितलेले आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा ५0,९२१ कोटींवर गेला आहे. आता हे नुकसान कंपनी ग्राहकांच्या खिशातून भरून काढणार आहे. 

येत्या 1 डिसेंबरपासून कंपनी कॉलचे दर वाढविणार आहे. याचबरोबर अन्य सेवांचेही दर वाढणार आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार Vodafone-idea ने सांगितले की, आपल्या युजरना जागतिक दर्जाच्या सुविधा सुरु ठेवण्यासाठी कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून दर वाढविणार आहे. मात्र, कंपनीने किती दर वाढविणार याचा खुलासा केलेला नाही. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या तीस कोटी युजरना बसणार आहे. 

नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा ५0,९२१ कोटींवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४४ हजार २00 कोटी रुपये दूरसंचार मंत्रालयाकडे जमा करायचे असून, यात आणखी १0 हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकेल, अशी शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे.

2017पासून कंपनीला नफाच झालेला नाही. व्होडाफोन-आयडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालू राहणे हे आता केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रिय चर्चाही करीत आहे. कंपनीवर 14 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाJioजिओ