शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सोशल मीडियावर माणसं अस्वस्थ का?; सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 08:32 IST

राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं.

ऑनलाईन जगात जशी धमाल असते, अगणित फायदे असतात, गॉसिप असतं, दोस्ती असते तसाच प्रचंड रागही असतो आणि तो सातत्याने दिसत असतो. मग, ते ट्रोलिंग असो, हेट कॉमेन्ट्स असोत नाहीतर गॉसिपच्या नावाखाली सातत्याने व्यक्त होणारा राग असो. ऑनलाईन जगात वावरताना हा राग सतत दिसतो, जाणवतो आणि त्याचा त्रासही भोगण्याची वेळ येऊ शकते. 

राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं. अनोळखी माणसांवर विनाकारण आपण का रागावलेलो असतो हे समजून घेतलंच पाहिजे. सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. आपलं हटकेपण, वेगळेपण सिद्ध करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं. प्रत्यक्ष जगातही माणसं हे करतातच पण, ऑनलाईन जगात हे अस्त्र मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. स्वतःचं वेगळेपण जगाला दाखवण्याच्या नादात सतत इतर कुणाला तरी नावं ठेवली जातात आणि हे करता करता मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला जातो. 

सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. सतत रागावलेली असतात. चिडलेली असतात. कारण सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तिथे गोष्टी घडल्या नाहीत तर, चिडचिड होऊ शकते आणि त्यातून येणारा राग प्रत्यक्ष आणि आभासी जगात निघायला सुरुवात होते. सतत ऑनलाईन असण्याच्या नादात मद्यपान, वेळेवर न खाणं, अति खाणं, पुरेशी झोप न होणं हे सगळे प्रकार घडतात. त्यातून एकूण शरीर स्वास्थ्य बिघडतं. परिणाम राग. अजून एक कारण म्हणजे ऑनलाईन होणाऱ्या चर्चा. यात माणसांचा पेशन्स चटकन संपतो आणि भांडाभांडी, रागराग सुरु होतो.

ऑनलाईन राग ही अतिशय कॉमन भावना आहे. कारण एकतर इथे निनावी वावरता येतं आणि नाव घेऊन वावरलं तरी लगेच कुणी दात तोडायला येणार नसतं. जी काही हाणामारी असते ती फक्त शाब्दिक असते, त्यामुळे ती काहीशी सेफ वाटते. मग, आपण अधिकच रागवायला आणि राग सतत व्यक्त करायला लागतो.  ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंटची आज जवळपास प्रत्येकाला गरज आहे. हा विषय नवा असला तरी टाळता येण्यासारखा नाहीये. कशी करावी ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंट. बघूया पुढच्या भागात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया