शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

१०० कोटी खर्च, रुग्णांची परवड थांबेना; जिल्हा रुग्णालय बंद झाल्याने ताण वाढल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 8:52 AM

कळवा रुग्णालयावर वार्षिक १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वार्षिक १०० कोटींचा खर्च करूनही रुग्णालयात आजही अनेक  सुविधा नसल्याचेच दिसून आले आहे. आता ही घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालय बंद झाल्याने कळवा रुग्णालयावरील ताण वाढल्याचा दावा केला आहे. मात्र दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालय बंद होते, तर त्यानुसार त्याचा ताण कळवा रुग्णालयावर येईल, याची कल्पना रुग्णालय प्रशासनाला नव्हती का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कळवा रुग्णालयावर वार्षिक १०० कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे. परंतु अद्यापही येथे येणाऱ्या रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार येथे मिळत नसल्याचे दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात साथरोग आल्यानंतर रुग्णालयाचा ताण वाढत असतो, परंतु यंदा अचानक ताण वाढल्याची माहिती रुग्णालय प्रशासन देत आहे.  अतिरिक्त रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरुपात रिकाम्या जागेत खाटा लावल्या जात आहेत. परंतु जागाही कमी पडत असल्याचा दावा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी केला आहे. त्यानुसार आम्हाला वाढीव जागा हवी असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात सद्य:स्थितीत १२५ शिकाऊ डॉक्टर आणि १५० च्या आसपास तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

भविष्यात वाढणार आणखी ५०० बेड

पुढील १० महिन्यांत रुग्णालयाचा कायापालट केला जाईल, असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. ६० कोटींच्या धीतून अतिरिक्त ५०० बेडसह सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

प्रशासन खोटे बोलते की काय?

एकाच दिवशी एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालय बंद असल्याचे कारण पुढे केले.  मात्र जिल्हा रुग्णालयात १८६ बेड रिक्त असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितल्याने प्रशासन खोटे बोलते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- रुग्णालयाच्या ओपीडीवर - रोज २२०० हून अधिक रुग्णांचा ताण - बेडची क्षमता : ५००, दाखल रुग्ण ५६६ - आयसीयूमधील हेड :  ४०, सर्व फुल्ल  -प्रसूतीमध्ये : १५ टक्क्यांची वाढ

रुग्णालयातील स्टाफ असा - कर्मचाऱ्यांची संख्या : ८००  - परिचारिका : १८० - वैद्यकीय प्राध्यापक : १२५ - निवासी डॉक्टर : १५०

‘अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करू’ 

भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी बोलत होत्या.  

आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्याही मोठा जिल्हा आहे. एका बाजूला सिव्हिल हॉस्पिटलचे काम सुरू असताना आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण गरजेचे आहे, असे तटकरे म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार नेमल्या जाणाऱ्या समितीला विभागानुसार आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज आहे का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल