शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास!

By सुरेश लोखंडे | Published: December 31, 2022 7:00 PM

देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

ठाणे : देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून रस्त्यांसह, उद्याने, तलाव, पार्र्किं ग, वृक्ष, सीसीटीव्ही आदींव्दारे शहर सुशोभीकरणासह सर्व सोयीसुविधा युक्त करण्यासाठी १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाल्याचा अहवाल आहे. परंतु या नवीन वर्षातील आगामी सहा महिन्यात म्हणजे जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करणार, असा संकल्प ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ संदीप माळवी यांनी लोकमतला सांगितले.

 स्मार्ट सिटी मिशन हे केंद्र शासनाची योजना आहे. याव्दारे पंतप्रधानांनी जून २०१५ रोजी भारतातील एकूण १०० शहरांना स्मार्ट सिटीचा दर्जा दिला आहे. त्यात राज्यातील १० शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. ठाणे महापालिकने ठाणे स्मार्ट सिटी लि. या कंपनीची स्थापना करून त्याव्दारे विविध स्वरूपाचे १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमध्ये शहराच्या विकासात्मक कामांचा समावेश आहे. क्षेत्रधारीत विकास, पॅन सिटी सोल्युशन, ठाणे रेल्वे स्थानक परिसर,नौपाडा, पांचपाखाडी, खारकर आळी उथळसर आदी भागांमधील रस्ते, सोयी सुविधाचा समावेश आहे. याशिवाय त्यामध्ये मुख्यत्वे सॅटीस ठाणे (पू). वॉटरफ्रंट, मॅटल हॉस्पिटल नजीक नवीन रेल्वे स्टेशन, पायाभूत सुविधा, सौरऊर्जा छतांचा अंतर्भाव आहे. तर पॅन सिटी सोल्युशन मध्ये वायफाय, स्मार्ट मिटरींग, डिजी ठाणे, सीसीटीव्ही या प्रकल्पांच्या कामांचा समावेश या स्माट सिटीत केलेला आहे. यासाठी अंदाज एक हाजर १९१ कोटींचा खर्च निश्चित केला आहे.

             या हजार कोटींच्या खर्चातून आतापर्यंत अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यावर ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झालेला आहे. मात्र अजूनही तब्बल छोटेमोठे १४ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण या कामाला आधीच उशिर झालेला आहे. त्यामुळे नवीन वर्षातील जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस माळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाणेकरांना या नवीन वर्षात स्मार्ट सिटीच्या या सर्व प्रकल्पांच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी फक्त जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तत्पुर्वी बहुतांशी प्रकल्पही पूर्णत्वास आली आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत जरी या पाच कामांचा उल्लेख झालेला असला तरी सर्व प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी फक्त जूनपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे सुतोवाच मोळवी यांनी केले आहे.

या प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या एक हजार १९१ कोटींच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान आणि स्वत: ठाणे महापालिकेने तजविज केली आहे. यामध्ये केंद्राकडून ५०० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा आहे. त्यातून आतापर्यंत ३४३ कोटी प्राप्त झाले. तर राज्य शासनाकडून २५० कोटींची अपेक्षा असून त्यापैकी १७१ कोटी प्राप्त झाले आहेत. तर महापालिकेने स्वत: २०० कोटींची तजवीज आदी मिळून ७१४ कोटीं प्राप्त अनुदान आहे. यातून तब्बल ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झाल्याचे आढळून आले आहेत. हाती घेतलेल्या प्रकल्पातून बहुतांशी प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरट्यवर आहे. फक्त सॅटीसह नवीन रेल्वे स्टेशन हे दोन प्रकल्प रखडणार असल्याचे प्रतिपादन माळवी यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे