शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 05:57 IST

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर रविवार सकाळपर्यंत म्हणजे १२ तासांत आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही कात्रीत पकडून जाब विचारला आहे.

आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृत्यू झालेले रुग्ण ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्टदरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते. १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर पाच रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या दाव्यानुसार मृत्यू झालेले रुग्ण ३३ ते ८३ वर्षांचे होते. काही वयोवृद्ध तर नऊ रुग्ण खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत शेवटच्या क्षणी दाखल करण्यात आले होते.

रुग्णांना होते गंभीर आजार?

दगावलेल्या रुग्णांपैकी काही अपघातग्रस्त होते. अल्सर, लिव्हर खराब होणे, न्यूमोनिया, विष प्राशन, डायलिसिस, डोक्याला मारहाण, युरिन इन्फेक्शन, ऑक्सिजनची कमतरता, बीपी कमी होणे, ताप आदींमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश असून, त्याचा मृत्यू कसा झाला, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.  

दोन दिवसात दोषींवर कारवाई : आरोग्यमंत्री 

पुणे : रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारे रुग्णांच्या जिवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल पाहून दाेषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात दिली. मृत्यू झालेल्यांपैकी १३ रुग्ण आयसीयू वॉर्डमधील, तर चार रुग्ण जनरल वाॅर्डमधील आहेत. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे गुलदस्त्यात आहे. याबाबत आराेग्यमंत्री सावंत म्हणाले की, ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमकं काय घडलं? हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त झाला की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

चौकशी समिती नियुक्त 

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आली. समितीत आरोग्यसेवेचे आयुक्त, आरोग्य संचालक, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जे.जे. रुग्णालयाचे तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक आदींचा समावेश आहे.

उपचारांचा प्रश्न गंभीर का? 

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याने उपचारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानादेखील प्रशासनाला जाग आली नाही. ही अतिशय दुर्दैवी बाब असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

मी माझ्या भावाला उपचारासाठी कल्याण येथून आणून या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्याचा मृत्यू झाला. सकाळपासून शवविच्छेदनाची मागणी करत आहे. ती पूर्ण होत नाही. - नीता राजे, रुग्णाचे नातेवाईक.

माझ्या मुलाने रॉकेल पिल्यामुळे चार दिवसांपासून तो येथे उपचार घेत होता. परंतु तो गंभीर आहे का? याबद्दल डॉक्टरांनी काही माहिती दिली नाही. रात्री त्याला मृत घोषित केले. - सुनील गोडे, मृत रुग्णाचे वडील

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल