शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
3
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
4
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
5
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
6
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
7
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
8
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
9
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
10
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
11
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
12
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
13
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
14
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
15
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
16
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
17
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
18
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
19
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
20
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई

भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी २०० कोटींचा निधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 5:35 PM

Bhatsa Dam : भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे, असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देसरकारने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येत आहे.

- रविंद्र सोनावळे

शेणवा : मुंबई व ठाणे महानगरांना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य अवश्य असलेल्या विकास कामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाख रुपयांचा भरीव असा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील महत्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रीयेस मान्यता दिली आहे. यांत मुंबई व ठाणे या प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या कामांचा देखील समावेश असून धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-२ व ३ या धरण प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. 

सरकारच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात भातसा धरणासाठी ११४ कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार असून विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केली जाणार आहेत.यामध्ये भातसा धरणाच्या उर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे, या महत्वपूर्ण कामाचा समावेश आहे. या कामांमुळे धरणाची गळती रोखण्यास मदत होईल.

धरणावरील मॅकनिकल उपकरणाची तसेच धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट या (यंत्रसामग्रीची)डागडुजी करणे ,व धरणावरील विद्युत प्रणालीचे देखभाल व दुरुस्तीकरण करणे, धरण माथ्यावर जाणारे पोचरस्ते तयार करणे,प्रामुख्याने अशी महत्वाची कामे या मंजूर निधीतून केली जाणार आहेत अशी माहिती भातसा धरणाचे सहाय्यक अभियंता श्याम हंबीर, व गणेश कचरे  यांनी बोलताना दिली.  

धरण परिसरातील अन्य कामांसाठी दुसऱ्या टप्यात ८६ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीत उर्वरीत प्रस्तावित व आवश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत असे भातसा धरणाच्या सहाय्यक अभियंत्यांनकडून सांगण्यात येत आहे. धरणांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा करताना त्यांचे बळकटीकरण, व्यवस्थापन करणे, धरणांचे परिचालन व देखभाल यामध्ये सातत्य राखणे हा महत्वाचा उद्देश जलसंपदा विभागाचा आहे असे सांगितले जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची भातसावर महत्वाची जबाबदारी आहे.प्रतिदीन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमिटर मधून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. तर डावा कालव्याचे काम अपूर्ण आहे.भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते .

भातसा धरणाची गळती रोखण्याचे प्रयत्न यापूर्वी भातसा धरणाच्या मुख्य धरण बांधातून छिद्रांद्वारे पाण्याची होणारी गळती रोखण्यासाठी मोजणी क्रमांक १ डी ते मो. क्र. ११ व मो. क्र. १२ अ ते मो. क्र. २५ ब तसेच तपासणी गॅलरी आणि उच्चस्तर गॅलरी मधील छिद्रांचे ड्रिलींग व सिमेंट ग्राऊटींगचे कामे करण्यात आली यासाठी जलसंपदा विभागाने २६ कोटी रुपये खर्च करुन धरणाची गळती काही अंशी थांबविण्यासाठीचे प्रयत्न केले गेले आहेत. 

या ग्राऊटींगच्या कामामुळे ९८ हजार प्रतिमिनीट असणारी गळती ६० हजार प्रतीमिटर इतकी कमी झाली आहे.असे सांगितले जाते परंतु अद्यापही धरणातून पाण्याची गळती सूरु असल्याने ही गळती थांबविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाच्या मजबूतीकरणाची कामे अत्यावश्यक आहेत, असे भातसा धरणाच्या जलसंपदा विभागातील अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण