शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

२७ गावांत पुन्हा पाणी पेटले

By admin | Published: March 11, 2016 2:30 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांत ६० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. असे असतानाही या गावांत महापालिका पाण्याचे टँकर पुरवत नाही

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांत ६० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. असे असतानाही या गावांत महापालिका पाण्याचे टँकर पुरवत नाही. इतकेच काय, तर बोअरवेल्सची दुरुस्ती आणि विहिरींच्या स्वच्छतेकडेही प्रशासन लक्ष देत नाही, अशी ओरड स्थायी समिती सदस्यांनी गुरुवारी सभेत केली. विशेष म्हणजे महापालिकेने आपत्कालीन पाणीटंचाईच्या आराखड्याची अंमलबजावणीही अजून केलेली नाही, असे सदस्यांनी सांगितले. या प्रकरणी सभापतींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते. दरम्यान, उपायुक्त दीपक पाटील शुक्रवारी २७ गावांत पाहणी करून पाणीटंचाईचा आढावा घेतील, असे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले.प्रभाग क्रमांक ११३ मधील शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे, भाजपा नगरसेवक रमाकांत पाटील आणि हर्षली थविल यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेच्या अन्य हद्दीपेक्षा २७ गावांत पाणीकपात जास्त आहे. धरणात पाणी नसल्याने कपात लागू असल्याचे सदस्यांनी मान्य केले. मात्र, एमआयडीसीकडून ६० टक्के कपात लागू झाली आहे. यापूर्वी हीकपात ३५ टक्के होती. त्यामुळे गावांतील पाण्याची स्थिती बिकट आहे. गावातील बोअरवेल्सची दुरुस्ती होत नाही. टँकर मागवूनही पालिका ते पुरवत नाही, अशी व्यथा म्हात्रे यांनी मांडली. गाव परिसरातील इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वस्तीला पाणी दिले जात नाही. हा दुजाभाव आहे. पाण्याचे नियोजन केले जात नाही. सदस्यांनी तक्रारी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही, असे पाटील म्हणाले. अधिकारीही गावांत फिरकत नाहीत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा हे सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप सदस्यांनी केला. या मुद्द्यांवरून सभापती संदीप गायकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेने गावांसाठी आपत्कालीन पाणीटंचाईकृती आराखडा तातडीने मंजूर केला आहे. त्यासाठी २५ कोटींचा निधीही देऊ केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही, असे सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीटंचाईचा कृती आराखडा कागदावरचपाणीटंचाईच्या कृती आराखड्यात बोअरवेल्स खोदणे, नादुरुस्त बोअरवेल्सची दुरुस्ती, विहिरींची स्वच्छता, पाणी साठवण्यासाठी टाक्या बसवणे, आदी कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे अजून सुरू झालेली नाहीत. ‘त्या’ दिवशीही टँकर बंदमहापालिकेने पाणीपुरवठ्याचे कंत्राट खाजगी कंत्राटदाराला दिले आहे. महापालिकेने या टँकरद्वारे ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करायचा आहे. एका टँकरपोटी महापालिका २ हजार ३९० रुपये कंत्राटदाराला मोजते. महापालिकेकडे १५ टँकर होते. त्यात, आणखी दोनची भर पडली आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद असतो, त्या दिवशी टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही.पाणीबिलाच्या वसुलीची सक्ती अयोग्यमहापालिका नागरिकांना पाणी देत नसेल, तर टंचाईच्या काळात पाणीबिल वसुलीसाठी सक्ती करणे योग्य नाही. पावसाळ्याश्चात पाणीबिल वसुलीची सक्ती करावी, असे सभापती गायकर यांनी प्रशासनाला सूचित केले आहे.