शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

पाकिस्तानी नौकांचा जीवघेणा पाठलाग; मृत श्रीधर चामरेच्या सासऱ्यांनी सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:31 IST

फटाक्यांसारखा आवाज येत असल्याने आम्हाला ते दिवाळीनिमित्त फटाके फोडीत असावेत असे वाटले.

- हितेन नाईकपालघर : ‘‘भारतीय क्षेत्रात समुद्रात मासेमारी करीत असताना जवळ आलेल्या पाकिस्तानी गस्ती नौकेने आमच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. आम्ही जीव वाचविण्यासाठी लपत असताना केबिनवर बसलेला श्रीधर चामरे हा खाली केबिनमध्ये उतरत असताना एका गोळीने त्याचा वेध घेतला. मात्र, अर्ध्या तासाच्या आमच्या जीवघेण्या पाठलागानंतर ११ तास प्रवास करून आम्ही सहा जण जीव वाचविण्यात यशस्वी ठरलो’, अशा शब्दात प्रत्यक्षदर्शी तथा श्रीधरचे सासरे नामदेव मेहेर (५६) यांनी मच्छीमार बोटीवरील गोळीबाराच्या घटनेचा थरार ‘लोकमत’ला सांगितला.

‘‘केंद्र शासित प्रदेशातील दिव (वनगबारा) येथील ‘जलपरी’ ही ट्रॉलर २६ ऑक्टोबर रोजी ओखा बंदरातून मासेमारीला रवाना झाली होती. काही तास प्रवास केल्यावर १० दिवस समुद्रात माशांच्या थव्यांचा शोध घेत होतो. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सातपाटी येथे मोबाइलवरून संपर्क करून दुपारी दीड वाजेपर्यंत मी आणि माझा जावई श्रीधर हसतखेळत पत्नी, मुलांशी बोललो होतो,’’ असे नामदेव मेहेर यांनी सांगितले. संध्याकाळी चार वाजता आम्ही समुद्रात सोडलेली ‘डोल’ बोटीत घेत असताना दूरवरून एक स्पीड बोट येताना दिसली. काही अंतरावर आल्यावर  त्यांनी आमच्यावर अचानक गोळीबार करायला सुरुवात केली.

फटाक्यांसारखा आवाज येत असल्याने आम्हाला ते दिवाळीनिमित्त फटाके फोडीत असावेत असे वाटले. परंतु, एक गोळी पाणी ठेवण्याच्या टाकीला लागल्यावर पाकिस्तानी गस्ती नौकेतून गोळीबार होत असल्याचे लक्षात येताच आम्ही सावध झालो. तत्काळ बोटीचे कॅप्टन दिलीप (३६) याने आपल्या ट्रॉलरचे इंजिन सुरू करून वेगाने ती माघारी वळवली. यादरम्यान पाठीमागून जोरदार गोळीबार करीत आमचा पाठलाग सुरू झाल्याने आम्ही सात सहकारी थरथरत होतो. आपल्याला त्यांनी पकडल्यास ते आपली हत्या करतील किंवा आपल्याला पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडावे लागेल, या भीतीने आम्ही कॅप्टनला ट्रॉलर जोराने पळवायला सांगत होतो,’’ असे मेहर यांनी सांगितले.   

‘‘याचदरम्यान पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना मदतीला बोलावल्याने आणखी एक गस्ती नौका त्यांच्या मदतीला आली. त्या दोन गस्ती नौकांद्वारे आमचा जीवघेणा पाठलाग करीत आमच्यावर गोळीबार सुरू झाला. यावेळी  केबिनवर बसलेल्या श्रीधरला मी खाली येण्यास सांगून आम्ही मासे ठेवण्याच्या पेटीत (खणात) लपून बसलो. यादरम्यान कॅप्टन दिलीप याने ट्रॉलरचा स्पीड कमी होत असल्याने ओरडून मदतीला येण्याबाबत सांगितले. आम्ही दोघे लपतछपत इंजिन रूममध्ये शिरल्यावर डिझेलच्या नोझलची नळी तुटून गळती होत असल्याने ट्रॉलरचा वेग कमी होत असल्याचे लक्षात आले.  यावेळी एक युक्ती सुचल्याने जवळच पडलेल्या प्लास्टिक बाटलीचा वापर करून ती गळती काही प्रमाणात रोखण्यात आम्हाला यश आले,’’ अशी माहिती मेहेर यांनी दिली.

‘‘आम्ही यावेळी केबिनमध्ये शिरलो असता कॅप्टनच्या गालाला गोळी चाटून तो जखमी झाला. आता पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडू, या विचाराने आम्ही रडू लागलो; परंतु आपले सारे कौशल्य पणाला लावून कॅप्टन आपली ट्रॉलर वेगाने अंधारातच किनाऱ्याकडे सुसाट पळवत होता. याचदरम्यान केबिनमध्ये श्रीधर निपचित पडल्याचे लक्षात आल्यावर, तो बेशुद्ध पडला असावा या भावनेतून त्याला आम्ही कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न सुरू करताच त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. यावेळी त्याच्या पाठीतून घुसलेली गोळी छातीतून बाहेर आल्याने त्याचा  जागीच मृत्यू झाल्याचे आम्हाला आढळले. 

यादरम्यान सुमारे ३०-४० मिनिटे समुद्रात एखाद्या चित्रपटात शोभून दिसावा असा आमचा जीवघेणा पाठलाग सुरू होता. शेवटी काही अंतरानंतर पाकिस्तानी गस्ती नौकांनी आमचा पाठलाग करणे सोडून दिले आणि त्या गस्ती नौका माघारी निघून गेल्या. ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रत्यक्षात मृत्यूला हुलकावणी देत मोठ्या महत्प्रयासाने पहाटे ३ वाजता आम्ही सुखरूपपणे आपले बंदर गाठले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला,’’ असे  मेहेर यांनी सांगितले.  

मच्छिमारांना नेले पकडून

या घटनेआधी पोरबंदर येथील दोन ट्रॉलर्स आणि त्यातील मच्छीमारांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडून नेल्याची माहितीही आम्हाला मिळाल्याचे मेहेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बाबत केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत असेही ते म्हणाले.

टॅग्स :palgharपालघरFishermanमच्छीमार