शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
3
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
4
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
5
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
6
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
7
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
8
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
9
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
10
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
11
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
12
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
13
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
14
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
15
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
16
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
17
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
18
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
19
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
20
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!

महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:30 PM

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली

- प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री यांच्यासोबत सोमवारी झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत ठाण्यातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याने ठाणे शहरासह जिल्ह्यातील ३०० गोविंदा पथकांनी दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाराज गोविंदा लवकरच एक बैठक घेऊन नव्या समन्वय समितीची स्थापना करणार आहेत.

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली, तसेच या बैठकीची कल्पनाही दिली नसल्याचे महाराष्ट्र समन्वय समितीचे उपाध्यक्ष समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्र समन्वय समितीशी ठाणे जिल्हा समन्वय समिती संलग्न आहे. छोटे-मोठी मंडळे मिळून ३०० हून अधिक मंडळे ठाणे जिल्हा समन्वय समितीशी जोडली गेली आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल तेव्हा ठाणे शहराच्यावतीने एका गोविंदा पथकाच्या किमान एका पदाधिकाऱ्याला तरी मुख्य समितीकडून निमंत्रित केले जाईल, अशी ठाणे शहरातील गोविंदा पथकांची आशा होती. मात्र, ही आशा त्यांची फोल ठरली. मुंबईतील सात ते आठ पदाधिकारीच उपस्थित होते. त्यात एखादा ठाण्याचा पदाधिकारी घेऊ शकत होते, असे गोविंदा पथकांनी सांगितले. त्यामुळे मुख्य समन्वय समिती आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेले गोविंदा पथक लवकरच नवीन समन्वय समितीची स्थापना करणार आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतून जे गोविंदा सोबत येतील त्यांना या समितीत घेतले जाईल. तसेच, लवकरच रूपरेषा ठरविली जाईल, असे ठाण्यातील गोविंदा पथकांनी सांगितले. 

गोविंदा पथकांच्या बाजूने या बैठकीत कोणती भूमिका मांडली, याची कल्पना ठाणे शहरातील गोविंदा पथकांना नाही. ठाण्यातील गोविंदा पथकांना विश्वासात न घेता ही बैठक झाल्याने मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य समितीवर ठाण्यातील दोन पदाधिकारी असतानादेखील निमंत्रित केले नाही. - समीर पेंढारे, उपाध्यक्ष,दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

आम्ही वेगळी समिती स्थापन करणार आहोत. मुख्य समिती आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.          - नीलेश वैती, जतन गोविंदा उत्सव मंडळ

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ठाण्यातून एकाला सहभागी केले नाही. येथेदेखील समन्वय समितीचे पदाधिकारी असून, एकाला तरी निमंत्रित करायला हवे होते. - सचिन खारकर, सहयोग गोविंदा पथक

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीthaneठाणे