शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

ठाणे जिल्ह्यातील आपत्ती निवारण, उपाययाेजनांसाठी चार काेटी

By सुरेश लोखंडे | Published: April 25, 2023 7:27 PM

आराखडा तयार करून कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

ठाणे : मान्सूनमध्ये जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये. आपत्ती आली तरी त्याचे परिणाम तीव्र होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणांनी काळजी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून कामे ३१ मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिल्या. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा नियाेजन समितीने चार काेटींची तरतूद केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले.

महापालिकांसह, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन आदी संबंधित यंत्रणांचा आपत्ती नियंत्रण व उपाययाेजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करत तहसीलदार राजाराम तवटे यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, एनडीआरएफ, पोलिस, गृहरक्षक दल यांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ५०० आपदा मित्रांना प्रशिक्षण

आपत्ती सौम्यीकरणासाठी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. या निधीतून आपत्ती निवारण व इतर कामांसाठी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे चार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनही आवश्यक ते साहित्य घेण्यात येणार आहे. आपत्ती काळात जलद प्रतिसादासाठी जिल्ह्यात ५०० आपदा मित्रांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कोणत्याही आपत्ती काळात हे आपदा मित्र मदतीसाठी तयार आहेत, असेही सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले.