शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:35 PM

पालकमंत्र्यांना दिले पत्र

डोंबिवली: महानगरपालिका क्षेत्रातील ३० ते ४५ वर्षांपासून जुन्या इमारतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ४ चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) संदर्भात आपल्या दालनात बैठक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली.

महानगरपालिका अस्तित्वात येण्या अगोदर येथे ग्रामपंचायत राजवट होती. परिसरातील भुमिपुत्र शेतकरी बांधव शेती करून आपला उदर निर्वाह चालवीत होते. त्याच बरोबर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना घर मिळावा व आपल्या कुटुंबाचाही उदर निर्वाह चालवावा म्हणून त्याकाळात अल्पदरात सामान्य माणसांना परवडणारी घरे भाडेतत्वावर बांधून देण्यात आली. त्यानंतर १९८३ ला महानगर पालिका अस्तित्वात आली त्यावेळी १९८३ ते १९९५ पर्यंत प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९५ साली महापालिकेची प्रथम निवडणूक झाली. त्यावेळी आपल्या शहराचा विकास व्हावा म्हणून परिसरातील आगरी कोळी भूमिपुत्रांनी आपल्या जमीनी विविध आरक्षणा साठी दिल्या.

त्यातून रस्ते, मध्य रेल्वे, दिवा वसई रेल्वे, बागबगीचे, खेळाचे मैदान, शाळा कॉलेज, पाणीपुरवठा योजना, विद्युत पुरवठा, औधोगिक विकास (एम. आय. डी.सी.), सी. आर. झेड., बफर झोन तसेच आताचे रेल्वे प्रलंबित कॉरिडॉर, माणकुली ते शीळ फाटा बायपास रस्ता (रिंगरूट) तसेच विविध विकास कामासाठी आगरी कोळी भूमिपुत्रांच्या जमिनी आरक्षित केल्यामुळे मूळचा आगरी कोळी भुमिपुत्र भुमिहीन झाला असून त्यावर उध्वस्त होण्याची वेळ आल्याचे केणे म्हणाले.

महापालिका क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्र हा महत्वाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत काळापासून ते आजपर्यंत सुमारे ३० ते ४५ वर्षांपासून उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारती आता धोकादायक परिस्थिती मध्ये आहेत सदर इमारतीला सुमारे दोन, अडीच चटईक्षेत्र वापरण्यात आले आहे. परंतु महापालिकेच्या नियमा प्रमाणे सध्या एक चटई क्षेत्र (एफ. एस. आय.) देण्यात येत आहे. तसेच जुन्या व धोकादायक बांधकामांना सध्याच्या अटी व शर्ती प्रमाणे जमीन मालक यांना मोबदलाही मिळत नाही व तेथे राहत्या रहिवाश्याना घरे देणेही शक्य होत नाही. असाच प्रश्न बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्माण झाला होता. त्याला उपाय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गरजा समजून त्यांना न्याय देण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) मंजूर करून दिले व जमीन मालक व रहिवाश्यांचा प्रश्न सोडवला.

त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्रला (४ एफ. एस. आय.) मंजुरी मिळावी जेणे करून जमीन मालकाला (घरमालक) त्याचा मोबदला मिळेल व राहत्या रहिवाश्याना त्यांचे घर मिळेल. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये उत्पन्नाची भर होईल व सरकारी जमिनीवरील महसूल शासनाला मिळेल. या आधीही तत्कालीन मुख्यमंतत्री देवेंद्र फडणवीस यांना २४/१२/२०१८ व २५/०६/२०१९ रोजी सदर मागणी संदर्भात निवेदन दिले होते. तसेच विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही १७ डिसेंबर ही निवेदन दिलेल आहे. परंतु नगरविकास विभागाचे मंत्री शिंदे असल्याने त्यांच्यासोबत चर्चा होणे गरजेचे आहे.तरी सदर अर्जाचा गांभीर्यपूर्वक विचार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ४ चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) मंजूर करून जमीन मालक (घरमालक) व रहिवाश्याना योग्य न्याय मिळवून द्यावा असे केणे म्हणाले

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे