शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मांजामुळे १२ कबुतरांचा गेला बळी; चायनीज, नायलॉन मांजावर कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 00:47 IST

मीरा-भाईंदरमधील चित्र : विविध सामाजिक संस्थांच्या केंद्रांत ९० जखमींना आणले

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी व बुधवारी पतंगांच्या मांजामुळे ९० कबुतरे जखमी झाली. त्यातील १२ कबुतरांना जीव गमवावा लागला. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी होत चालली आहे. परंतु, चायनीज वा नायलॉन मांजावर कारवाई झाली नसल्याची खंतही संस्थांनी बोलून दाखवली आहे.

भार्इंदर पश्चिमेच्या जैन अ‍ॅलर्ट ग्रुपने १२ वर्षांपूर्वी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासह पतंगांच्या मांजांमुळे होणाऱ्या जीवघेण्या प्रकारांविरोधात जनजागृती सुरू केली. विविध माध्यमांतून या ग्रुपने जनजागृती करत पतंग न उडवण्याची शपथ देण्यास लावली. याशिवाय अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट, स्टेनलेस स्टील असोसिएशन, जीवदया फाउंडेशन, समकीत ग्रुप आदींनीही शहरात यासाठी जनजागृती व जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत. यंदाही मकरसंक्रांतीच्या आधी या संस्थांनी पतंग उडवल्याने मांजामुळे होणाºया परिणामांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांत मांजामुळे जखमी झालेली ९० कबुतरे विविध केंद्रांत उपचारासाठी आणली होती. त्यातील १२ कबुतरांचा मृत्यू झाला. यात भार्इंदर पश्चिमेच्या अहिंसा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात २२ जखमी कबुतरे आली होती व त्यातील तिघांचा मृत्यू झाला. जैन अ‍ॅलर्ट ग्रुपच्या केंद्रात आलेल्या जखमी ३७ कबुतरांपैकी चौघांचा मृत्यू झाला. भार्इंदर पूर्वेला स्टेनलेस स्टील असोसिएशन व जीवदया फाउंडेशन यांनी उभारलेल्या केंद्रात ११ जखमी कबुतरांना उपचारासाठी आणले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मीरा रोडच्या समकीत ग्रुपच्या केंद्रात जखमी १८ कबुतरांपैकी तिघांचा मृत्यू झाला. जीवदया परिवार केंद्रात बुधवारी आलेल्या दोन जखमी कबुतरांपैकी एकाचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांत पतंगबाजीमुळे जखमी व मृत्युमुखी पडणाºया कबुतरांच्या संख्येत घट होत असून त्याला विविध संस्थांनी गेल्या काही वर्षांत चालवलेल्या जनजागृतीचे प्रमुख कारण आहेच. पण, त्याचसोबत वाढती महागाई व आजकाल मुले, तरुण मोबाइलमध्ये गुंतल्याने पतंग उडवण्याचे प्रमाण घटले असल्याचे अहिंसा ट्रस्टचे कौशल शाह यांनी सांगितले. पतंगबाजीदरम्यान कापलेली पतंग व मांजा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे झाडांवरील मांजा पक्ष्यांना घातक आहे. त्यात अडकून पक्षी जखमी वा मरण पावतात. त्यामुळे पालिकेने शहरातील झाडांवर अडकलेला मांजा काढून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.चायनीज, नायलॉन मांजावर कारवाई नाहीपतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या चायनीज वा नायलॉन मांजावर पोलिसांनी कारवाई केली. परंतु, मीरा-भार्इंदरमध्ये मात्र अशी कारवाई झाली नाही. वास्तविक, महिनाभर आधीपासून बंदी असलेल्या अशा घातक मांजावर कारवाई झाली असती, तर जखमी व मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांच्या संख्येत आणखी घट झाली असती. यामुळे कारवाई व्हायला हवी होती, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kiteपतंग