शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

४१ सदस्यांचे समर्थन आवश्यक

By admin | Published: March 07, 2016 2:23 AM

परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील ही जोडगोळी सध्या एकत्र आहे. या दिग्गज नेत्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणता सदस्य करेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यामुळे दोन तृतीयांश सदस्यांचा आकडा गाठणे विरोधकांना मुश्कील असल्याचे दिसून येते.शिवसेना हा सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर फेकला गेला आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सत्ता असावी असे शिवसेनेला वाटत आहे. यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेंद्र दळवी, अ‍ॅड. राजीव साबळे यांना सर्वाधिक सत्तेची स्वप्ने पडत असल्याचे राजकीय हालचालींवरुन दिसून येते. शिवसेनेचे १६ सदस्य असून त्यामध्ये आता महेंद्र दळवी, राजीव साबळे, कविता गायकवाड, शामकांत भोकरे यांची साथ लाभली आहे. त्याचप्रमाणे अन्य नाराज सदस्य संपर्कात असून ते किती आहेत हे दळवी यांनी सांगितले नाही.अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण अशी सभापती पदे शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस-शेकापकडे आहेत. निवडून आलेल्या महत्वाच्या सदस्यांना किमान सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याचा अलिखित करार दोन्ही पक्ष नेतृत्वाने केला होता. त्याची मुदतही कधीच संपलेली आहे, असे नाराज सदस्य सांगत आहेत. त्यामुळे मुदत संपलेली असताना नवीन निवडी का जाहीर केल्या जात नाहीत, असा प्रश्न नाराज सदस्यांकडून केला जातआहेत.यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन पक्षप्रतोद शामकांत भोकरे आणि शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीची अपेक्षा होती, तसेच अन्य काही सदस्यांना सभापतीपदाची आस असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे शेकापचे पनवेल येथील एकनाथ देशेकर हेही उपाध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत आणि त्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेला ते शिवसेनेच्या गोटात जाऊन बसल्याचे दिसून आले. शेकापच्या अन्य काही सदस्यांनाही सभापतीपद मिळावे असे दिसून येते.या नाराज सदस्यांना एकत्र बांधण्याचे काम महेंद्र दळवी आणि अ‍ॅड.राजीव साबळे करीत आहेत. नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांसह शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठकही घेतली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता आहे.