शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

४२ लाख ‘परदेशीबाबू’ यूपीच्या वाटेवर; तिसऱ्या लाटेमुळे अगोदरच धरली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 11:25 IST

महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.

- संदीप प्रधान ठाणे : मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तब्बल ४२ लाख उत्तर भारतीय उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरिता तिकडे निघाले आहेत किंवा अनेक जण कोरोनाच्या भीतीने अजून तिकडेच आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका व मुंबई महापालिका निवडणूक साधारणपणे जवळपास येत असल्याने या मतदाराला तिकडे जाण्यापासून रोखण्याकरिता राजकीय पक्षांना धडपड करावी लागते. मात्र यावेळी महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.उत्तर प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने उत्तर प्रदेशातील जी मंडळी पोटापाण्याकरिता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत वास्तव्य करतात त्यांनी गावाकडची वाट धरली. दुसऱ्या लाटेच्या वेळी उ.प्र.मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी येथील मंडळींनी तिकडे धाव घेऊन मतदान केले होते, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस अरविंद तिवारी यांनी लक्ष वेधले.  उत्तर भारतीय महापंचायतचे विनय दुबे म्हणाले की, महाराष्ट्रात ८० लाखांच्या आसपास उत्तर भारतीय असून त्यापैकी ४२ लाख हे तिकडे व येथे मतदार आहेत. कोरोनामुळे त्यापैकी २५ टक्केच परतले. उर्वरित तिकडेच असून यावेळी मतदान करतील. उ.प्र.मधील ४८ टक्के तरुण यावेळी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान करतील व त्यामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तरुण आहेत. मुंबईत पत्रकारिता केलेले व समाजवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार रामकिशोर त्रिवेदी म्हणाले की, मुंबईत येणारे बहुतांश उत्तर भारतीय पूर्वांचलमधून येतात. मागील वेळी त्यांनी भाजपला मते दिली. मात्र, सध्या या भागात मोकाट जनावरांचा प्रश्न तापला असून, त्यामुळे सरकारविरोधी वातावरण आहे. पत्रकार व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला म्हणाले की, पूर्वांचलच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे राजकारण जातीपातीभोवती फिरते. मात्र यावेळी भाजपने लाभार्थ्यांची नवी जातकुळी निर्माण केली आहे. २४ कोटींच्या उ.प्र.मध्ये १८ कोटी लोक केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत. पाच कार्यकर्त्यांचा एक गट याप्रमाणे गट करून वेगवेगळ्या विभागात लाभार्थ्यांच्या याद्या घेऊन हे कार्यकर्ते जातील व लोकांना मतदानाकरिता आवाहन करतील.भोजपुरी इंडस्ट्री मैदानात भोजपुरी स्टार्स निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रवीकिशन, दिनेशलाल यादव तथा निरुव्वा, मनोज तिवारी हे भाजपकरिता प्रचार करणार असून खेसारीलाल यादव हे समाजवादी पार्टीकरिता मैदानात उतरणार आहेत.