शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सूर्याचे ५ दरवाजे उघडले, मोडकसागर ओव्हरफ्लो

By admin | Published: July 16, 2017 2:20 AM

मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे/कासा : मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाखालील वाडा व पालघर तालुक्यातील ४२ गावांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. तर बुधवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी साडेसहानंतर सुर्या धरणाचेही सर्व पाच दरवाजे उघडले आहेत.शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालीत पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.काही दिवस पावसाने दडी मारली असताना ठाणे, पालघर आणि मुंबईसह राज्यावर पाण्याचे संकट ओढवले होते. मात्र, बुधवारी रात्रीपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील धरणे झपाट्याने भरू लागली आहेत. यापैकी शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळील मोडकसागर या धरणाच्या पातळीत या पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांतच या धरणामधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पुढील २४ तास पाऊस असाच बरसत राहिला, तर धरणामधील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. हा परिसरातील गावांना धोक्याचा इशारा ठरू शकतो. याकरिता, येथील सहायक जलअभियंत्यांनी या धरणाच्या टप्प्याखाली येणाऱ्या ४२ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. या यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त, आपत्कालीन विभाग, भिवंडी, शहापूर, वाडा, पालघरचे तहसीलदार आदींचा समावेश आहे. तर, या धरण आणि नद्यांच्या टप्प्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गावांमध्ये दाधारे, जोशीपाडा, शेले, तिलसे पिंप्रोली, धीनदेपाडा, गाले, अनशेत, तुरी, सारसी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स बुद्रुक, शील, गेट्स खुर्द, अब्जे, आलमान, कुतल, बोरांदे, आवंधे, नाने, गलतरे, हमरापूर, सावरे, पाचूधारा, इंबुर, खडकीपाडा, मनोर, उधारापाडा, बहलोली, बोट, दहिसर मनोर, देवानीपाडा, खामलोली, विश्रामपूर, साखरे, ललटने, उंचवली, कोरीचापाडा, कोनपाडा आणि नवघर या गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे वाडा आणि पालघर तालुक्यांतील आहेत. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी ५३५.२६ फूट टीएचडीएवढी आहे. त्यामुळे हे धरण केव्हाही पूर्ण भरून वाहू शकते. त्यामुळे या गावांना हा इशारा देण्यात आला आहे.४२३७ क्यूसेक्स विसर्गकासा : दोन दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सूर्या धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून ४ हजार २३७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातल्या शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण (धामणी) सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे ७६ टक्के भरले असून पाणी नियंत्रणासाठी शनिवारी संध्याकाळपासून धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पेठ, म्हसाड येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणची वाहतूकही खोळंबून राहिली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दुर्घटनेचे वृत्त हाती आलेले नव्हते.