शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Published: May 20, 2024 8:41 PM

या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभा मतदारसंघातील २४ उमेदवारांप्रमाणेच कल्याण मतदारसंघाताील २८ आणि भिवंडी लाेकसभेचे २७ उमेदवार आदी मिळून जिल्ह्यातील या ७९ उमेदवारांना सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवरील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. मात्र शेवटच्या एका तासाचे मतदान येण्यास विलंब हाेणार असल्यामुळे जिल्ह्याभरात संध्याकाळपर्यंत ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.

जिल्ह्यात आज पाचव्या टप्यात मतदान झालं आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ ला ५०.२१ टक्के मतदान जिल्ह्याभरात झाले हाेते. त्यात यावेळी वाढ हाेऊन ते ५५ टक्केपर्यंत जाण्याचा आंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील या तिन्ही लाेकसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्राव्दारे ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. यंत्र बंद पडण्याच्या किरकाेळ घटना वगळता जिल्ह्यातील या तिन्ही मतदारसंघात आज शांततेत मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र उन्हाची दाहकता वाढल्यामुळे मतदारांचा उत्साह कमी झालेला दिसून आला. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंतच्या दाेन फेऱ्यांमध्ये ठाणे लाेकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभांमध्ये १४.८६ टक्के मतदान झाल्याची नाेंद आहे. तर कल्याणमध्ये १४.१२ टक्के आणि भिवंडी मतदारसंघात १४.७९ टक्के मतदान पहिल्या चार तासात झाल्याची नाेंद आहे.

जिल्ह्यात १ वाजेपर्यंत २५.३५ टक्के मतदान झाले हाेतेत्र त्यापैकी ठाणे मतदारसंघात २६.०५ टक्के म्हणजे सहा लाख ५३ हजार ३५२ मतदान झाले. कल्याणमध्ये २२.५२ टक्के म्हणजे चार लाख ६९ हजार ४६ जणांनी मतदान केले. भिवंडीत २७.३४ टक्के म्हणजे पाच लाख ७० हजार ७५० जणांनी मतदान केल्याचे उघड झाले आहे. याप्रमाणेच ३ वाजेपर्यंत या मतदारसंघात सात लाख ७३ हजार ६६६ जणांनी मतदान केंले असता ३७.०६ टक्के या मतदानाची नाेंद झाली. तर ठाण्यात ३६.०७ टक्के म्हणजे नऊ लाख चार हजार ६६१ मतदांनी मतदान केल्याचे उघड झाले. तर कल्याणमध्ये सहा लाख ७५ हजार ४५२ म्हणजे ३२.४३ टक्के मतदान ३ वाजेपर्यंत झाल्याची नाेंद करण्यात आलेली आहे. या मतदानात कल्याणमध्ये ५ वाजेपर्यंत सुमारे १० टक्के वाढ हाेऊन ती ४१.७० टक्के म्हणजे आठ लाख ६८ हजार ५२७ जणांनी मतदान केल्याचे उघड हाेत आहे. याप्रमाणेच ठाण्यामध्ये १० टक्के वाढ हाेऊन ४६.७७ टक्के म्हणजे ११ लाख ७३ हजार २५ मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. तर भिवंडीत सर्वाधिक १३ टक्के वाढ हाेऊन ५ वाजेपर्यंत ४९.४३ टक्के म्हणजे दहा लाख ३१ हजार ९०२ जणांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेVotingमतदान