शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

उल्हासनगर महापालिकेची थकीत ५०० कोटींची पाणीपट्टी माफ, शासनाचा निर्णय

By सदानंद नाईक | Published: March 13, 2023 9:15 AM

महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती.

उल्हासनगर : महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीपट्टीची ७०० पैकी ५०० कोटींची दंडात्मक रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतल्याने, महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. बैठकीला महापालिका अधिकारी व स्थानिक नेते उपस्थित होते. 

उल्हासनगर महापालिकडे स्वतःचे पाणी स्त्रोत नसल्याने, एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला होतो. महापालिकेला १२० एमएलडी पाण्याचा कोटा मंजूर असून त्यावरील पाण्यासाठी १२ रुपये प्रति एमएलडी असा दीडपट दर आकारण्यात येत होता. तो दर देखील ८ रुपये प्रति एमएलडी करण्याचा निर्णय उदय सामंत यांनी रविवारी झालेल्या बैठकीत घेतला. अशी माहिती शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मंजूर कोट्यापेक्षा अधिकच्या पाणी पुरवण्यासाठी एमआयडीसी जादा दराने देयक आकारत असल्याने, थकबाकीची रक्कम ७०० कोटीवर गेली. यापूर्वी उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठका झल्या होत्या. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने थकबाकी रक्कमे बाबत बैठक होऊन तब्बल ५०० कोटींची दंडात्मक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुद्दल सुमारे २०० कोटी रूपये पुढील दहा वर्षात योग्य हप्त्यात भरण्याची योजना एमआयडीसीने करण्याचे निर्देश उधोगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेला मोठा दिलासा मिळाला असून गेल्या अनेक वर्षापासूनचा थकबाकीची विषय निकाली निघाला आहे. 

सामंत यांच्याकडील बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी बी‌.डी. मलिकनेर, अधीक्षक अभियंता सुधीर नागे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, अभियंता बी एस पाटील इत्यादी उपस्थित होते. तर शिवसेनेकडून पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर संघटक नाना बागुल, अरूण आशान, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज आदीजन उपस्थित होते.

स्वतःचा पाणी स्रोतची मागणी शहराच्या हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी जात असून नदीतील पाणी उचलून उल्हासनगरला पुरवठा करण्यात येत आहे. त्यापेक्षा नदी किनारी महापालिकेने स्वतःचा पाणी स्रोत निर्माण केल्यास, नागरिकांना मुबलक कमी दरात पाणी मिळणार आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक राजकीय नेत्यांनी याबाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUday Samantउदय सामंत