शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महिन्याभरात होणार ५ हजार बेवारस वाहनांचा लिलाव; ठाणे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 4:28 PM

बेवारस अवस्थेत आढळलेल्या १३८७ पैकी सर्वाधिक ९८१ वाहने ठाणे शहरांतील आहेत.

ठाणे : ठाण्यातील रस्त्यावर ठाण मांडलेल्या बेवारस वाहनांच्या विरोधात ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या  पोलिसांनी सुरू केलेली कारवाई आता तीव्र झाली आहे. गेल्या पंधरवड्यात एक हजार ३६९ बेवारस वाहनांना नोटिस बजावल्यानंतर जवळपास ९४५ मालकांनी आपली वाहने हटवली आहेत. उर्वरित वाहनांच्या लिलावासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे. या वाहनांसह शहरांतील मोकळे भूखंड व्यापलेल्या तब्बल पाच हजार बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतल्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ते अपुरे पडू लागले आहेत. अशातच या रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात उभी दिसतात. वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच दरवर्षी पावसाळ्यात रोगराईला निमंत्रण देणारी ही वाहने हटविण्याची मोहिम ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सुरू केल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. यामुळे ठाणे शहरांतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.    

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत १३८७ वाहने बेवारस स्थितीत आढळली आहेत. त्यापैकी १३६९ वाहनांवर नोटिस चिकटविण्यात आली होती. त्यानंतर ९४५ वाहन मालकांनी आपली वाहने रस्त्यावरून हटवली आहेत. वाहतूक शाखेने २३६ वाहने हटवली आहेत. उर्वरित ३८८ वाहनांच्या चेसी आणि रजिस्ट्रेशन क्रमांकाची माहिती संकलित करून ती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे धाडण्यात आली आहेत. तिथून या वाहनांच्या मालकांचे पत्ते मिळाल्यानंतर त्यांना रितसर नोटीस धाडली जाईल.

सात दिवसांत मालक पुढे आले नाहीत, तर पुढील १५ दिवसांसाठी स्थानिक न्यायालयामार्फत जाहीर सूचना काढली जाईल. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल. नँशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी) पोर्टलवर या लिलावाची कायदेशीर प्रक्रिया नमूद केलेली आहे. त्याला अनुसरून वाहनांचा लिलाव होईल, असे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.याच पद्धतीने ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील विविध ठिकाणच्या डंपिंग यार्डांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या वाहनांच्या मालकांचाही मागोवा काढण्याचे काम वाहतूक विभागाने सुरू केले आहे.

ठाण्यात लोढा, तसेच साकेत पोलिस मैदान, मुंब्रा, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या ठिकाणच्या डंपिंग ग्राउंडवर वाहतूक विभाग तसेच स्थानिक महापालिकांनी जप्त केलेली किमान पाच हजार वाहने आहेत. त्यांचाही निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महापालिकेने जप्त केलेली वाहने आणि वाहतूक विभागाने जप्त केलेली वाहने यांची वर्गवारी करून परिवहन विभागाच्या मदतीने या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे अत्यंत जिकिरीचे काम सध्या सुरू असल्याची माहितीही बाळासाहेब पाटील यांनी दिली. मूळ मालकांचा शोध घेतला जाईल आणि मग उर्वरित वाहनांचा लिलाव केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहरांत सर्वाधिक वाहनांवर कारवाई

बेवारस अवस्थेत आढळलेल्या १३८७ पैकी सर्वाधिक ९८१ वाहने ठाणे शहरांतील आहेत. त्या शालोखाल ३०३ वाहने कल्याण-डोंबिवली शहरांतील असून उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे अनुक्रमे ४१ आणि ३७ वाहने आढळली आहेत. आरटीओकडे माहितीसाठी पाठवलेल्या ३८८ पैकी ५० वाहनांची माहिती वाहतूक शाखेला प्राप्त झाली आहे. त्यापैकी २९ वाहन मालकांच्या पत्त्यावर नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. तर, ४५ वाहनांच्या चेसी आणि रजिस्टेशन क्रमांकाची माहितीच मिळू शकलेली नाही.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे