शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

चार लोकसभा निवडणुकांत ५३ जणांचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:08 IST

मतदारांचा दणका। राष्ट्रीय पक्ष, अपक्षांना बसला फटका

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २००९ मध्ये ३१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी कल्याणचा समावेश ठाणे मतदारसंघात होता. ठाण्यात २००८ मध्ये झालेली लोकसभेची पोटनिवडणूक आणि २००४ मधील निवडणुकीत २२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.एकूण मतांच्या तुलनेत प्रस्थापित पक्षही विजयी ठरलेल्या शिवसेना उमेदवाराशी झुंज देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अन्य राजकीय पक्ष आणि अपक्षांनाही एकूण मतदानाच्या १६ टक्के मते मिळवता आलेली नाहीत. सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार प्रकाश परांजपे चार वेळा शिवसेनेतर्फे निवडून आले होेते. त्यापूर्वी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. भाजप व शिवसेना युतीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा गणला गेला. विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणाऱ्या परांजपे यांना २००४ मध्ये विजयाचा बोनस मिळाला होता. ते चौथ्यांदा निवडून आले होते. त्यावेळी एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. प्रकाश परांजपे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे २००८ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे त्यांचे चिरंजीव आनंद यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी ते विजयी झाले. यावेळी १६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.२००९ मध्ये पुनर्रचनेनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. तेव्हा कल्याण मतदारसंघ नव्याने तयार झाला. तेथून पुन्हा शिवसेनेतर्फे आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली. ते विजयी झाले. यावेळी रिंगणात २० उमेदवार होते. त्यापैकी १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. २०१४ मध्ये परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेतर्फे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यावेळी १७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा